मे महिना संपून पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असतानाही मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावातील नाल्यांचे उपसण अद्याप झालेले नाही.
परिणामी ठिकठिकाणी नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत असून,
त्यामध्ये दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
Related News
उंबर्डा बाजार ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर
अकोला : आदिवासी हक्कांसाठी ‘बिरसा क्रांती दल’चं धरणे आंदोलन, निधी व सर्टिफिकेट घोटाळ्याच्या विरोधात आवाज
अकोला : दाळंबी गावात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा ZP सीईओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
अकोला : मॉर्निंग वॉकला गेलेल्या इसमाच्या ई-बाईकला अचानक आग; जीवितहानी टळली
इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कुंभारी येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत
बोर्डी घरकुल योजनेच्या बांधकामाचा चौकशी अहवाल सादर
संत्रा फळबाग मृग बहारसाठी एकच दिवस पोर्टल खुले
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून जखमींची विचारपूस
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
मुख्य रस्त्यांवरून घाण पाणी वाहत असल्यामुळे गावातील लहान मुले, वृद्ध, महिलांना रोजच्या हालचालींसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शाळा,अंगणवाडी, देवस्थान परिसरातसुद्धा हीच अवस्था दिसून येते.
ग्रामस्थांनी अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी रोज या रस्त्यांवरून ये-जा करतात, पण त्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांच्या मनात रोष निर्माण झाला आहे.
“निवडणुकीच्या काळात आश्वासनांची भरमसाठ वचने देणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर
मात्र गावकऱ्यांच्या समस्या ऐकण्यास तयार नसतात,” असा आरोप ग्रामस्थांकडून होतो आहे.
गाव विकासासाठी कोणतेही ठोस नियोजन किंवा कृती होताना दिसत नाही.
विकासाची मोठी स्वप्ने दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गावातील मूळ गरजा – नालेसफाई, स्वच्छ पाणी, रस्ते आणि सार्वजनिक दिवाबत्ती – या
प्राथमिक बाबींवर देखील काम होत नसल्याने, ग्रामस्थांच्या संतापाला उधाण आले आहे.
“गावाला स्मार्ट बनवण्याची क्षमता आपल्यात नाही , पण कमीत कमी मुलभूत गरजा तरी पूर्ण करा,” अशी माफक अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-daambi-gavat-acute-panitancha-citizen-zp-ceo-office/