शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना
शिवसेना ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे,
फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे.
Related News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिनिव्हामधील ७८व्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीला नवी दिल्लीहून व्हर्च्युअली संबोधित केल्यानंतर,
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अदानॉम गेब्रेयेसस ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकतेच एका अल्पवयीन मुलाला भारताविरुद्ध जासूसी व देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी
असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या बातमीनंतर प...
Continue reading
पुणे – राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर
आल्यानंतर आता संपूर्ण प्रकरणात नवे वळण आले आहे. वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप...
Continue reading
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत असून, आज (२१ मे) दुपारी १
वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण २५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, चेन्नई आणि ...
Continue reading
मुंबई : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काही काळासाठी घसरणीनंतर पुन्हा एकदा
सोने महागले असून, आज 21 मे रोजी देशभरातील अनेक शहरांमध्ये सोने दर वाढले आहेत.
24 कॅरेट ...
Continue reading
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने आपल्या कबुली जबाबात पाकिस्तानच्या
सूचनेनुसार काम केल्याचं मान्य केलं आहे.
देशविरोधी कारवायांमध्ये तिचा थेट सहभाग होता, अशी धक्कादायक मा...
Continue reading
रत्नागिरी : राज्यात परत एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकणात दरड कोसळण्याच्या
घटनांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
विशेषतः वेरवली-विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोस...
Continue reading
देहरादून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. डोंगराळ
भागांपासून मैदानांपर्यंत जोरदार पावसाची आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान वि...
Continue reading
मुंबई : राज्यात प्री-मान्सून पावसाने जोरदार एंट्री घेतली असून हवामान विभागाने आज (21 मे) 22
जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण, घाटमाथा आणि मराठवा...
Continue reading
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून अखेरीस शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या योजनेचा लाभ वेळेत मिळवायचा असे...
Continue reading
अकोला : आयपीएल 2025 च्या प्लेऑफ शर्यतीत निर्णायक वळण आले असतानाच,
आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अत्यंत
महत्त्वाचा सामना रंगणार आहे. मात...
Continue reading
अकोल्यातील न्यू तापडिया नगर, खरप, पाचपिंपळ, घुसर, आपातापा आदी ग्रामीण
भागात येण्या जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलाचे काम सध्या सुरू आहे.
मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाच...
Continue reading
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना
ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन
मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे.
शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं असताना आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
मला असं वाटतं की, प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत,
विशेषत: जे साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांना वारवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत,
किंवा ते तशाप्रकारचं वक्तव्य नेहमी करत असतात. मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरच्या ज्या कमेंट आहेत,
तशा कमेंट करणं योग्य नाहीये, त्यांनी देखील मर्यादा पाळायला पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आमचे ओएसडी आणि पीएस सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही,
असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे, यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पहिली गोष्ट माणिकराव कोकाटे यांना कदाचित हे माहिती नसेल पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार
हा मुख्यमंत्र्यांनाच आहे. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात, आणि मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतात.
मी कॅबिनेटमध्येच स्पष्ट सांगितलं होतं की, तुम्हाला जी नावं पाहिजे ती तुम्ही पाठवा. पण ज्या नावामध्ये ज्यांची
नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामांमध्ये समावेश आहे, त्यांच्या नावांना मी परवानगी देणार नाही.
आतापर्यंत माझ्याकडे 125 जणांची नावं आली, त्यातील 109 नाव मी क्लिअर केली आहेत, उर्वरीत नावांना परवानगी दिली नाही,
कारण त्यांच्यावर कुठला न कुठला आरोप आहे, त्यामुळे कोणी नाराज झालं तरीही
मी अशा लोकांच्या नावाला मान्यता देणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/juna-kirana-bazar-income-tax-department-action-paan-masala-betel-sea-soluble-dhad/