मुर्तीजापूर तालुक्यातील हिरपूर गावात आज एक अत्यंत क्लेषदायक चित्र समोर आलं –
नाल्याच्या घाण पाण्यातून अंत्ययात्रा. उन्हाळ्याच्या कडक उन्हातही गावकऱ्यांच्या संतापाचा पारा
अधिकच उंचावला. कारण मृताच्या सन्मानासाठीच नव्हे, तर माणुसकीच्या नावानेही प्रशासनाने कानाडोळा केला आहे.
Related News
“मी ब्रिजभूषण प्रकरणातील सहा पीडितांपैकी एक आहे” – Vinesh Phogat चा खळबळजनक आरोप; रेसलिंगमध्ये पुनरागमनापूर्वी मोठा वाद
भारताची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये...
Continue reading
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला तब्बल एक लाखांहून अधिक वऱ्हाडी; शाही सोहळा ठरला चर्चेचा विषय
प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार
Continue reading
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा विवाहसोहळा ठरला चर्चेचा विषय; संस्कृती जपल्याचे कौतुक तर खर्चावरून पुन्हा टीका
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार
Continue reading
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा: मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत दिग्गजांची हजेरी | पाहुण्यांची मोठी यादी चर्चेत
(Sangamner Wedding News: 100 एकरांवर भव्य विवाह...
Continue reading
अमेरिकेचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब! ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनं जगात खळबळ | युरोपियन कार-ट्रकवर 25% कर लागू
(USA Trade Policy Update: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, जागतिक अर्थव्यवस्...
Continue reading
कलिंगडाबाबत मोठी चर्चा: कापलेलं टरबूज किती दिवस ताजं राहतं? आरोग्यास धोका किती? संपूर्ण माहिती
(Watermelon Facts: मुंबईतील घटनेनंतर कलिंगडाबाबत भीतीचे वातावरण)
मुंबईतील पायधुनी प...
Continue reading
सोन्याच्या दरात मोठा बदल: 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर किती पैसे मोजावे लागतील? | संपूर्ण अपडेट
(Gold Rate Update: अमेरिका-इस्रायल संघर्षाचा जागतिक बाजारावर परिणाम)
जगभरात ...
Continue reading
ठाकरे गटात मोठी खळबळ: परभणी जिल्हा प्रमुखाची तडकाफडकी उचलबांगडी | पडद्यामागील राजकारण काय?
(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात संघटनात्मक बदल, राजकीय हालचालींना वेग)
राज्याच्या र...
Continue reading
धक्कादायक 2026 पासपोर्ट क्रमवारी जाहीर: सिंगापूर जगात अव्वल, भारत 80व्या स्थानी, पाकिस्तानची घसरण कायम
जगातील नागरिकांना व्हिसाशिवाय किती देशांमध्ये प्रवास करता येतो, यावर आधारित ...
Continue reading
गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता म्हणजे अपमानाचं जिवंत उदाहरण आहे.
ना पायवाट, ना सांडपाण्याचा बंदोबस्त. त्यामुळे अंत्ययात्रा काढताना गावकऱ्यांना घाण पाण्यातून वाट काढावी लागते.
मृताच्या कुटुंबासाठी ही एक दुहेरी शिक्षा ठरते – एकीकडे आप्तजनाच्या निधनाचं दु:ख आणि दुसरीकडे त्या अंतिम संस्कारासाठी होणारी अवहेलना.
एक ज्येष्ठ ग्रामस्थ म्हणाले –
“एवढे वर्ष झाले, प्रशासन बदलले, पदाधिकारी बदलले… पण स्मशानभूमीचा प्रश्न मात्र तसाच आहे.
आम्हाला ना रस्ता, ना पाणी, ना वीज. फक्त आश्वासनं मिळतात.”
महिलांनीही आपला आवाज ठामपणे उठवला –
“जेव्हा पुरुषही या रस्त्यावरून जायला घाबरतात, तेव्हा आम्हा महिलांची काय अवस्था होत असेल?”
आज सकाळी गजानन पंदेकर यांचे हृदयविकाराने निधन झाले.
अंत्यसंस्कारासाठी त्यांची अंत्ययात्रा जेव्हा नाल्यातून जावी लागली,
तेव्हा गावातील प्रत्येक डोळा पाणावला… पण हे अश्रू केवळ शोकाचे नव्हते – ते अपमानाचे होते.
प्रश्न एवढाच आहे – गावकऱ्यांच्या मृत्यूनंतरही जर सन्मान नसेल,
तर लोकशाहीत ‘जनतेचा राजा’ असलेल्या माणसाला न्याय कधी मिळणार?
हिरपूरच्या या दुःखाला आणि संतापाला उत्तर फक्त विकासात नाही – तर जबाबदारी स्वीकारण्यात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/passo-badhel-kasamapurat-chorratyancha-admission/