दिल्ली सरकार कोरोना महामारीदरम्यान आपला जीव गमावलेल्या
पाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये देणार आहे.
मुख्यमंत्री अतिशी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी
Related News
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
भगवान महावीर जयंतीनिमित्त अकोल्यात भव्य रॅलीचे आयोजन
दिल्ली सरकारने कोरोना महामारीत जीव गमावलेल्या 92
जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती.
कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर संकट होते –
यावेळी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, दिल्लीतील
लोकांनी कोरोना महामारीदरम्यान आपल्या जीवाची परवा न
करता, मानवता आणि समाजाच्या रक्षणासाठी काम केले आणि
बलिदान दिले. दिल्ली सरकार त्यांना सॅल्यूट करते. या रकमेने
मृतांच्या कुटुंबीयांचे झालेले नुकसान नक्कीच भरून निघू शकत
नाही. मात्र, यामुळे त्यांना सन्मानाचे जगण्यासाठी नक्कीच मदत
होऊ शकते. कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर
संकट होते. “या संकटाने सर्वांच्याच मात दहशत निर्माण केली
होती. मात्र, आपले डॉक्टर, मेडिकल स्टाफ, सहायक स्टाफ आणि
स्वच्छता कर्मचाऱ्यांसह हजारो लोकांनी रात्रंदिवस काम करून या
महामारीचा सामना करण्याचे काम केले. यात अनेकांना आपला
जीवही गमवावा लागला. सरकार या लोकांच्या कुटुंबीयांसह
नेहमीच खांद्याला खांदा लावून उभे आहे,” असेही आतिशी
म्हणाल्या.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-modi-will-give-11000-crores-gift-to-maharashtra-today/