मुंबई – शिखर बँक घोटाळा प्रकरणी राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) क्लोजर रिपोर्ट (C-Summary) अधिकृतपणे मंजूर करून या नेत्यांना क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची फाईल अधिकृतपणे बंद झाली आहे.
शिखर बँकेच्या कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा भडका २०११-१२ सुमारास उफरला. या प्रकरणात राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने नियमबाह्य कर्जवाटपामुळे डबघाईला गेले, आणि अत्यंत कमी किमतीत विकल्यामुळे बँकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे आरोप होते. ७० हून अधिक माजी संचालकांवर आरोप ठोकण्यात आले होते, ज्यात अजित पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांचा समावेश होता.
न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट तपासताना निरीक्षण केले की संबंधित संचालकांच्या कृतीमध्ये कोणतीही बेईमानी किंवा लबाडीचा हेतू दिसून येत नाही. तसेच, पूर्वनियोजित कट किंवा संगनमत करून बेकायदेशीर कृत्य केल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणेला मिळालेले नाहीत. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेला अहवाल स्वीकारला आणि प्रकरण बंद करण्याचा निर्णय घेतला.
Related News
अकोला : कॉक्रो जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यावर आंदोलनादरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात ...
Continue reading
4 वर्षांतच गायब झाला आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालेला ‘One Green Mile’ सायकल ट्रॅक; कोटींच्या प्रकल्पावर गंभीर प्रश्नचिन्ह
मुंबई : आतापर्यंत माणसे, कागदपत्रे किंवा मौल्यवान ...
Continue reading
3 वर्षे तुरुंगात राहिलेल्या सतीश उकेचा धक्कादायक दावा! फडणवीसांना क्लीन चिट, ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात वेळोवे...
Continue reading
4 वर्षांच्या चिमुरड्याच्या प्रसंगावधानाने वाचले 30 वर्षीय तरुणाचे प्राण; कळवा खाडीत 15 मिनिटांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
ठाणे शहरातील कळवा खाडी परिसरात सोम...
Continue reading
महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून “ऑपरेशन टायगर” या चर्चित विषयामुळे राजकीय वातावरणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळास...
Continue reading
Cabinet Meeting: मोठा दिलासा! नगरसेवकांसह ZP-पंचायत समिती सदस्यांसाठी मंत्रिमंडळाचे 6 ऐतिहासिक निर्णय; ग्रामीण पाणी, भारत नेट आणि ड्रोन धोरणाला...
Continue reading
पंढरपूरमध्ये रोहित पवारांच्या आंदोलनानंतर मोठा राजकीय वाद; आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडल्याचा प्रकार चर्चेत
पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित
Continue reading
पवनराजे निंबाळकर हत्याकांड: निकाल पुन्हा लांबला, ओमराजे निंबाळकर भावनिक; 20 जूनला होणार निर्णायक फैसला
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर
Continue reading
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकासकामांच्या उद्घाटनावरून सत्ताधाऱ्यांमध्येच श्रेयवाद उफाळला आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी मंत्री गणेश नाईकांवर मतदारसं...
Continue reading
मुंबईमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून राज्य सरकारकडून यावर विशेष लक्ष दिले जात आहे. उपमुख्यमंत्री Eknath Shinde य...
Continue reading
या निर्णयामुळे पवार कुटुंबासह संबंधित सर्व नेत्यांना कायदेशीर प्रक्रियेतून पूर्णतः क्लीनचीट मिळाली आहे. याचबरोबर, अंमलबजावणी संचालनालयाची (ED) चौकशीसाठीही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले राजकीय आणि कायदेशीर वाद आता पूर्णविरामाला पोहोचले आहेत.
शिखर बँक प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठा गाजावाजा केला होता. अनेक वेळा न्यायालयीन प्रक्रिया आणि तपास यंत्रणेच्या चौकशांमुळे या प्रकरणाला सामाजिक आणि राजकीय गती मिळाली होती. परंतु, न्यायालयाच्या अंतिम निर्णयामुळे आता हे प्रकरण संपूर्णपणे क्लिअर झाले असून पवार कुटुंबाला कायदेशीर आणि मानसिक दिलासा मिळाला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/the-sound-of-americas-attack-on-iran-trump-claims-7000-places-attacked-and-100-ships-destroyed/