मुर्तीजापुर | प्रतिनिधी
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताचे मन सुन्न झाले आहे.
निष्पाप पर्यटकांच्या हत्येने देश हादरला असून, या रक्तरंजित घटनेनंतर मुर्तीजापुरात संतापाचा ज्वालामुखी फुटला.
Related News
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
शास्ती पुर्ण माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा
बार्शीटाकळी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/लभाण तांडा समृद्धी योजनेच्या समित्यांची बैठक
जस्तगावातील शेतकऱ्यांचा तेल्हारा तहसीलवर मोर्चा;
मूर्तिजापूर : ग्रामीण भागातील वीजबिल निम्मे करण्याची मागणी
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेकडो नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक घटकांनी एकत्र येत
पाकिस्तानच्या आणि दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
“पाकिस्तान मुर्दाबाद!”, “दहशतवादाचा नाश झाला पाहिजे!”, “भारत माता की जय!” – अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
उपस्थितांनी हातात फलक, छातीवर देशभक्ती आणि डोळ्यांत अश्रू घेऊन हल्ल्यात बळी गेलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
“आता निषेध पुरे – आता कृती हवी!”
मुर्तीजापुरातून उठलेला हा आवाज फक्त निषेधाचा नाही,
तर निर्णायक कारवाईची जोरदार मागणी करणारा आहे.
व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक भावनांनी म्हणाले,
“देशाच्या सीमांना शब्दांनी नव्हे, तर निर्णायक कृतीने सुरक्षित ठेवलं पाहिजे.”
प्रा. दीपक जोशी आणि ज्ञानेश्वर देशपांडे यांचे मत –
“हे हल्ले आता असह्य झाले आहेत. सरकारने आता केवळ खंडन न करता, कठोर भूमिका घेतली पाहिजे. देश एकवटला आहे!”
तरुण नेते हर्षल साबळे यांनी ठाम शब्दांत सांगितले –
“आम्ही सहन करणार नाही. शत्रूला प्रत्युत्तर दिल्याशिवाय मागे हटणार नाही!”
एकजूट, ज्वाला आणि जबाबदारी
आजचा दिवस मुर्तीजापुरासाठी केवळ संताप व्यक्त करण्याचा नव्हता –
तर तो शांततेच्या नावाने उद्भवलेल्या अश्रूंचा आणि लढ्याच्या निर्धाराचा साक्षीदार ठरला.
देश आज एकच प्रश्न विचारतोय –
“आता बस्स! दहशतवाद संपवाच!”
Read Also : https://ajinkyabharat.com/death-must-be-done-by-us/