मुंबई, ९ मे २०२५ – भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
राज्यात सज्जता आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पोलिस, गुप्तवार्ता आणि नागरी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
Related News
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा अकोला दौरा; अकोट येथे विवाह समारंभास उपस्थिती
संशयास्पद माहितीवर विश्वास ठेवू नका;
सराफा दुकानात पुन्हा ‘बंटी-बबली-आजी’ टोळीचा हात;
अकोल्यातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात मोठा खुलासा; किरीट सोमय्यांची माहिती
आपत्कालीन स्थितीसाठी तयार राहा!
चेन चोरी करणाºया महिलेला सहा तासात केली अटक
मान्सून लवकर येणार! महाराष्ट्रात १० जूननंतर पावसाची शक्यता
भारतीय सेनेला विराट कोहलीचा सलाम
सायरन कधी वाजतो? – हवाई हल्ल्याच्या धोक्यावेळी नागरिकांना मिळतो किती वेळ वाचण्यासाठी?
जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे आवाहन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही दलप्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक;
चंदीगड-अंबालात हवाई हल्ल्याचा इशारा
बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा स्तरावर मॉकड्रिल राबवणे, ब्लॅकआऊट दरम्यान वैद्यकीय
सेवांची सतत उपलब्धता, सायबर सुरक्षा उपाय, जनजागृती मोहीम, सोशल मीडियावर देशविरोधी गतिविधींवर नियंत्रण इत्यादी अनेक महत्त्वाचे निर्देश दिले.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉर रूम’ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून,
आपत्कालीन फंड तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ब्लॅकआऊटच्या काळात रुग्णालयांच्या कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून पर्यायी वीजपुरवठा आणि गडद पडद्यांद्वारे संरक्षणाची सूचना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर देशविरोधी पोस्ट्स प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले,
तसेच सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे सायबर ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
सागरी सुरक्षेसाठी फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घेण्याचा निर्णय देखील चर्चेत आला.
Read Also : https://ajinkyabharat.com/extra-then-sasisathi-tayar-raha/