नवी दिल्ली | ९ मे २०२५ — भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून
चंदीगड आणि अंबालामध्ये हवाई हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चंदीगडमधील वेस्टर्न कमांड आणि अंबालामधील एअरफोर्स स्टेशन यामुळे हे ठिकाण महत्त्वाचं मानलं जातं.
Related News
“भारताच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत”
“भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अल्पवयीनाची गुजरातमधून अटक;
“मला 2 कोटी मागितले अन् वैष्णवीचा जीव गेला!”
भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव,
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ!
पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;
कोकणात मुसळधार पावसाचा कहर!
केदारनाथ ते देहरादूनपर्यंत पावसाचा इशारा!
मान्सूनची चाहूल! राज्यात प्री-मान्सूनची जोरदार हजेरी,
PM Kisan 20वा हप्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी 30 मे पूर्वी पूर्ण करा ‘हे’ महत्त्वाचे काम
पावसामुळे मुंबई इंडियन्सचे स्वप्न भंगणार?
उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावर शिवसेनेचे तीव्र आंदोलन;
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात, पाकिस्तान सीमेपासून २० किलोमीटर परिसरातील
गाव रिकामे करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
जैसलमेरमध्ये लष्करी तळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेतली जात आहे.
जम्मू-कश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने सात दहशतवाद्यांचा खात्मा केला
असून पाकिस्तानच्या ‘धनधार’ पोस्टवर प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये ११ ठिकाणी ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले.
जम्मू एअरपोर्ट आणि पठाणकोट एअरबेस सुद्धा पाकिस्तानी सुसाइड ड्रोनच्या निशाण्यावर होते.
भारताच्या डिफेन्स सिस्टीमने S-400 आणि आकाश मिसाईल
वापरून बहुतेक हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तानचे ५० हून अधिक ड्रोन भारताने पाडले आहेत.
पठाणकोटजवळ एक पाकिस्तानी फायटर जेट पाडल्याची माहिती आहे,
मात्र यास अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
कर्नाटकात भारतीय सैन्याला पाठिंबा दर्शवत तिरंगा यात्रा काढण्यात आली.
विविध राज्यांतील नेत्यांनी भारताच्या लष्कराशी एकजूट दाखवून देशाच्या रक्षणासाठी उभं राहण्याचा संदेश दिला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/lucknow-maharana-pratap-jayantiinimitta-tyachanya-putuyala-pushpanjali/