पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ७ मे रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’
अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत जशास तसे उत्तर दिले.
या निर्णायक कारवाईमुळे फक्त पाकिस्तानच नव्हे, तर त्यांच्या कायमस्वरूपी पाठीराख्या असलेल्या चीनलाही हादरा बसला आहे.
Related News
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
आशियामध्ये युद्धाचा भडका? चीन–जपान संघर्ष तणावाची स्थिती निर्माण
आशियातील दोन महाशक्तींपैकी चीन आणि जपान यांच्यातील राजनैतिक वाद पुन्हा एकदा उच्च...
Continue reading
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
सध्या परिस्थितीत चीनने पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असं काहीही टाळावं, अशा शब्दांत चीनने आपली भूमिका मवाळ केली आहे.
भारत आणि पाकिस्तानने शांततेने प्रश्न सोडवावा, असेही आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलं आहे.
विशेष म्हणजे, भारताच्या हल्ल्यापूर्वी फक्त तीन दिवसांपूर्वीच चीनच्या राजदूतांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांची
भेट घेऊन “बिनशर्त पाठिंबा” जाहीर केला होता. पण भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अवघ्या तीन दिवसांत चीनचा सूर पूर्णपणे बदलला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं, “भारत आणि पाकिस्तान हे आमचे शेजारी आहेत.
आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. दोघांनीही संयम पाळावा आणि शांतता राखावी, हे आमचं मत आहे.”
भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची अडचण वाढवली असून, त्यांच्या पाठीशी उभा असलेला एकमेव बलाढ्य देशही
आता सावध पवित्रा घेत आहे. या घडामोडींमुळे भारताने केवळ दहशतवाद्यांवर नाही,
तर आंतरराष्ट्रीय राजकारणातही आपलं सामर्थ्य दाखवलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-virender-sehwag-raina-aani-rahul-gandhi-yanchi-indian-lashrala-salute/