भारताच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघावर आयसीसीची कारवाई, समोर आलं आता नवीन प्रकरण…

भारताच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघावर आयसीसीची कारवाई, समोर आलं आता नवीन प्रकरण...

भारताचा सामना सुरु होण्यापूर्वी आता पाकिस्तानच्या संघावर

आयसीसीने कडक कारवाई केली आहे.

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे.

पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आता आयसीसीने पाकिस्तानवर कडक कारवाई केल्याचे आता समोर आले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांचे चॅम्पियन्य ट्रॉफीमध्ये प्रत्येकी एक सामना झाला आहे.

Related News

पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे.

पण भारताने पहिल्या सामन्यात विजय साकारला. भारताने पहिल्या

सामन्यात बांगलादेशवर मात करत आपले गुणांचे खाते उघडले आहे.

त्यामुळे पाकिस्तानसाठी आता करो या मरो, असाच सामना भारताविरुद्ध खेळावा लागणार आहे.

कारण भारताविरुद्धच्या सामन्यात जर पाकिस्तानचा पराभव झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.

भारत आणि पाकिस्तान

यांच्यातील सामना हा रविवारी खेळवण्यात येणार आहे.

पण आता शुक्रवारीच पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

कारण आयसीसीने आता पाकिस्तानच्या संघावर कडक कारवाई केली आहे.

पाकिस्तानचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर झाला. त्यावेळी पाकिस्तानचा पराभव तर झालाच

, पण त्यानंतर आता अजून एक मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे.

कारण या सामन्यात पाकिस्तानने संथ गतीने गोलंदाजी केली होती आणि त्याचा फटका आता त्यांना बसला आहे.

कारण आयसीसीने कडक कारवाई करताना पाकिस्तानच्या संघातील

सर्व खेळाडूंना मानधनाच्या पाच टक्के रक्कम दंड स्वरुपात कापण्यात येणार आहे.

त्याचबरोबर

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानला ताकिद

देण्यात आली आहे.

त्यामुळे आता भारताविरुद्धच्या सामन्यात जर पुन्हा एकदा पाकिस्तानं संथ गतीने गोलंदाजी केली,

तर आयसीसीच्या त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे आता समोर आले आहे.

त्यामुळे भारताविरुद्धच्या सर्वात दडपणाखालील सामन्यात आता पाकिस्तानला षटकांच्या गतीचे जास्त दडपण असणार आहे.

त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार आता या सामन्यात गोलंदाजांचा वापर कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर तमाम क्रिकेट विश्वाचे लक्ष असणार आहे. पण यावेळी पाकिस्तानवर सर्वात जास्त दडपण असणार आहे

. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी पहिला सामना गमावला आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानला आता षटकांची गती योग्य ठेवावी लागणार आहे.

रविवारच्या सामन्यासाठी भारताचे पारडे हे पाकिस्तानपेक्षा नक्की जड असल्याचे समोर आले आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/amhi-goat-kapanare-bajar-lady-amardarala-jeeve-maranyachi-threatened-hindi-marathi-patra-namam-kya-lihalanya/

Related News