पहलाग हल्ल्याचा बदला घेताना भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने जमिनीवरून ते आकाशात—सर्व पातळ्यांवरून पाकिस्तानच्या कुरापतींना धडक दिली आहे.
गेल्या काही दिवसांत रात्रीच्या वेळी भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी
Related News
दहशतवाद्यांच्या हालचालींना आळा घालण्यासाठी भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक केली असून,
यामध्ये पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लॉन्चपॅड्स व चौक्या बेचिराख करण्यात आल्या आहेत.
समोर आलेला एअर स्ट्राईकचा VIDEO – पाकिस्तानचे कंबरडे मोडले
व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की,
भारतीय लष्कर प्रेसिजन स्ट्राईकद्वारे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत आहे
पाकिस्तानी पोस्ट, बंकर, आणि लॉन्चपॅड्स पूर्णतः नष्ट
दहशतवाद्यांची हालचाल, जमाव आणि तैनाती केंद्रं उद्ध्वस्त झाली आहेत
सीमावर्ती भागात पाकिस्तानचे मोठे नुकसान
लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, या स्ट्राईकमुळे पाकिस्तानला मानसिक आणि भौगोलिक झटका बसला आहे.
सीमावर्ती भागातील त्यांची तैनात यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
भारताच्या या ऑपरेशनमुळे दहशतवादी कारवायांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.
ऑपरेशन सिंदूर – भारताचं आक्रमक धोरण
‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारताची केवळ कारवाई नसून, ही आहे एक संदेशवाहक रणनीती —
“सीमेपलीकडून एकाही कुरापतीला संयमाने नव्हे, तर सामर्थ्यानेच उत्तर दिलं जाईल.”
Read Also : https://ajinkyabharat.com/pari-aahe-me-actress-tejashwi-prakashcha-glummer-style/
