इस्लामाबाद | १२ मे :
भारताशी झालेल्या लष्करी झटापटीत पाकिस्तानच्या एका फायटर जेटला नुकसान झाल्याची
कबुली अखेर पाकिस्तान सैन्याने दिली आहे. मात्र, त्यांनी या लढाऊ विमानाचे नाव किंवा मॉडेल उघड केलेले नाही.
Related News
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
काटेपूर्णा अभयारण्यात आज वैशाख पौर्णिमेला मचाणावरून होणार प्राणी गणना
अकोट तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
रविवारी रात्री उशिरा पाक सैन्य प्रवक्त्याने हे नुकसान ‘कमी प्रमाणात’
असल्याचे सांगितले, मात्र भारताच्या कारवाईचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षानंतर सीमारेषा, हवाई क्षेत्र आणि समुद्रात
सर्व प्रकारच्या कारवाया थांबवण्याचे सीजफायरवर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.
भारताने पाकिस्तानवर जोरदार कारवाई करत ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले.
त्यासह पीओकेमधील दहशतवादी तळ, नियंत्रण रेषेवरील चौक्या आणि अनेक लष्करी ठाणीही उध्वस्त केली.
पाकिस्तानला झालेला हा फटका इतका गंभीर आहे की, ते सावरण्यास त्यांना अधिक
वेळ लागणार असल्याचे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे.
भारतीय लष्कराच्या कारवाईत ३५ ते ४० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, पाक सैन्याने हे देखील स्पष्ट केले आहे की,
भारताचा एकही वैमानिक त्यांच्या ताब्यात नाही आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा बातम्या खोट्या व भ्रामक आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/katepurna-sanctuary-today/