इस्लामाबाद | १३ मे :
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कारवायांमुळे
पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर हानी सहन करावी लागली. याच कारवाईदरम्यान रावळपिंडी येथील लष्करी
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
मुख्यालयासह क्रिकेट स्टेडियमवरही ड्रोन हल्ले करण्यात आले.
या हल्ल्यांमुळे पाकिस्तान सुपर लीग (PSL) तात्काळ स्थगित करण्यात आली
आणि नंतर स्पर्धा युएईत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पार्श्वभूमीवर PSL 2025 मध्ये सहभागी असलेल्या बांगलादेशच्या क्रिकेटपटू रिशाद होसैन
यांनी एक खळबळजनक खुलासा करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) गंभीर आरोप केले आहेत.
“ड्रोन हल्ले सुरू असताना आम्हाला कराचीत खेळत राहण्यास भाग पाडले जात होते,” असे त्यांनी म्हटले.
रिशादच्या म्हणण्यानुसार, PCB अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी PSL खेळणाऱ्या देश-विदेशातील खेळाडूंना
प्रत्यक्ष स्थितीबाबत काहीही माहिती दिली नव्हती. ड्रोन हल्ल्यांमुळे अनेक खेळाडू भयभीत झाले होते
आणि आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत चिंतेत होते. खेळाडूंनी विरोध करताच स्पर्धा युएईत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
“पाकिस्तानमध्ये राहून खेळणे सुरक्षित नाही, हे सर्वांना जाणवले होते.
आम्ही तातडीने देश सोडण्याचा निर्णय घेतला,” असेही रिशादने स्पष्ट केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatchaya-action-pakistanchaya-fighter-jetla-damage/