बार्शीटाकळीतील मांगुळमध्ये अवकाळी पावसाचा कहर :

बार्शीटाकळीतील मांगुळमध्ये अवकाळी पावसाचा कहर :

बार्शीटाकळी (अकोला) : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी

पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील मांगुळ येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश काकड यांच्यावर तर संकट कोसळलं आहे.

Related News

त्यांनी चार एकर शेतात हळद आणि कांद्याची लागवड केली होती,

मात्र काढणीस तयार असलेलं पीक पावसामुळे अक्षरशः सडून गेलं.

रमेश काकड यांनी कांदा आणि हळद साठवणीसाठी खास व्यवस्था केली होती.

मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे संपूर्ण साठवणूक बिघडली आणि त्यांचे अंदाजे १.५ ते २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे, इतकं मोठं नुकसान होऊनही अजूनपर्यंत कृषी विभाग वा तालुका

प्रशासनाकडून कोणीही पंचनामा करण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अधिकच नैराश्यात सापडला आहे.

“सरकारने त्वरीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी करून योग्य नुकसानभरपाई द्यावी,”

अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर आश्वासने दिली जात असतानाच,

प्रत्यक्षात अद्यापही पंचनाम्याचे काम सुरू न झाल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/paturamidhye-gavansh-smuggling-ughadkis/

Related News