अमरावती: आज (29 मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास अशोक वाटिका चौक
परिसरातील उड्डाणपुलावर कालीपिली महिंद्रा मॅक्स वाहनाने (MH 30 P 5686)
समोरून येणाऱ्या किया चारचाकी (MH 27 DE 4651) गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली.
Related News
Electricity Bill थकबाकी वाढल्याने Nagpur परिमंडलात मोठी कारवाई; 1 लाखांहून अधिक ग्राहकांना इशारा. वीज तोडणी, दंड आणि तुरुंगवासाची शक्यता—पूर्ण बातमी वाचा.
जेवणानंतर लगेच चहा-कॉफी पिणे आरोग्यास हानीकारक का ?
बेल्जियम: जगाची चॉकलेट राजधानी
Elon Musk : 77 लाख कोटींचा मालक, पण खिशात नगद फक्त 7708 कोटी!
सुरक्षित PPF गुंतवणूक: 7.1% व्याजाने 15 वर्षांत कमवा जास्त नफा!
मनोज जरांगे पाटील पुन्हा रस्त्यावर ? सरकारला आंदोलनाचा इशारा
रोहित पवार यांचे मोठे विधान: अजित पवारांच्या विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स भारताबाहेर पाठवला का?
केल्टन टेकच्या शेअरमध्ये 19.3% उंची: गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
‘Anupamaa’ February 17 Update : राही-प्रीमच्या निर्णयावर अनुपमाचा ठाम पाऊल
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघात कसा घडला?
टॉवरच्या दिशेने निघालेल्या कालीपिली वाहनाचा चालक गाडीवरील नियंत्रण गमावून
उड्डाणपुलावरील डिव्हायडरला धडकला आणि समोरून येणाऱ्या किया कारवर जाऊन आदळला.
अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करून दोन्ही चालकांना वाहनांसह पुढील तपासासाठी नेले आहे.
उड्डाणपुलावरील वाढते अपघात – नागरिकांमध्ये संताप
सदर उड्डाणपूल शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात आला असला तरी,
पुलाच्या उद्घाटनापासून अनेक अपघात घडले आहेत. काही वाहतूक चालक नो
एन्ट्री झोनमधून सर्रास वाहतूक करत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होते.
वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सेल्फी आणि रीलमुळे वाहतुकीला अडथळा
या उड्डाणपुलावर अनेक नागरिक सेल्फी काढणे आणि सोशल मीडियासाठी रील बनवणे
याकडे आकर्षित होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
यामुळेच या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांची मागणी – कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा
या पुलावर आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आणखी किती बळी
गेल्यावर प्रशासन उपाययोजना करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या पुलावर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
