अमरावती: आज (29 मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास अशोक वाटिका चौक
परिसरातील उड्डाणपुलावर कालीपिली महिंद्रा मॅक्स वाहनाने (MH 30 P 5686)
समोरून येणाऱ्या किया चारचाकी (MH 27 DE 4651) गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली.
Related News
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
दानापूर येथे लईत यात्रा महोत्सव साजरा.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघात कसा घडला?
टॉवरच्या दिशेने निघालेल्या कालीपिली वाहनाचा चालक गाडीवरील नियंत्रण गमावून
उड्डाणपुलावरील डिव्हायडरला धडकला आणि समोरून येणाऱ्या किया कारवर जाऊन आदळला.
अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करून दोन्ही चालकांना वाहनांसह पुढील तपासासाठी नेले आहे.
उड्डाणपुलावरील वाढते अपघात – नागरिकांमध्ये संताप
सदर उड्डाणपूल शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात आला असला तरी,
पुलाच्या उद्घाटनापासून अनेक अपघात घडले आहेत. काही वाहतूक चालक नो
एन्ट्री झोनमधून सर्रास वाहतूक करत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होते.
वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सेल्फी आणि रीलमुळे वाहतुकीला अडथळा
या उड्डाणपुलावर अनेक नागरिक सेल्फी काढणे आणि सोशल मीडियासाठी रील बनवणे
याकडे आकर्षित होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
यामुळेच या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांची मागणी – कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा
या पुलावर आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आणखी किती बळी
गेल्यावर प्रशासन उपाययोजना करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या पुलावर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी जोरदार मागणी होत आहे.