१७ एप्रिल २०२५ | अंबाजोगाई (जि. बीड) —
अंबाजोगाई येथील सनगाव गावात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
गावातीलच सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान हिला अमानुष मारहाण
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
केल्याची गंभीर घटना १४ एप्रिल रोजी समोर आली आहे.
पाठीवर पाईपने प्रचंड मारहाण करत तिची पाठ सोलून काढली असून,
तिला रक्त साकळेपर्यंत मारण्यात आले.
काय घडलं नेमकं?
ज्ञानेश्वरी अंजान यांना मायग्रेन व पाठीच्या दुखण्याचा त्रास असून,
सततच्या ध्वनिप्रदूषणामुळे त्यांचे आरोग्य ढासळले होते. २०२३ साली
गावातील मंदिरातील भोंग्याच्या आवाजाविरोधात तिने तक्रार केली होती.
सरपंच अनंत अंजान यांना विनंती करूनही आवाज कमी न झाल्याने तिने
अखेर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतरच आवाज कमी झाला.
या प्रकरणानंतर, सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी तिच्या घरी जाऊन
धार्मिक कार्यक्रम करण्याचा दबाव टाकला. त्यानंतर तिच्या घराशेजारी जाणीवपूर्वक
तीन पिठाच्या गिरण्या सुरू करण्यात आल्या. सततच्या आवाजामुळे ज्ञानेश्वरी यांची
प्रकृती आणखी खालावली. शेवटी, १४ एप्रिल रोजी सरपंच आणि त्याच्या १० कार्यकर्त्यांनी
तिला शेतात रिंगण करून काठ्या व JCB पाईपने बेदम मारहाण केली.
राजकीय प्रतिक्रिया
या घटनेची माहिती समोर येताच समाजात आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना विचारले,
“एका वकील महिलेला शेतात नेऊन मारहाण करणं, हा लोकशाहीतला काय न्याय आहे?”
त्यांनी याबाबत सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.
पोलिसांची भूमिका आणि गुन्हा दाखल
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी, ज्ञानेश्वरी अंजान यांना
एफआयआरची प्रत देण्यात आलेली नाही, असा आरोप आहे.
तसेच, तिच्यावर उपचार करून एका रात्रीतच घरी पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
“मी आज जिवंत आहे, ते फक्त पोलिसांमुळे, नाहीतर मला ते मारून टाकले असते,” असे तीने स्वतः म्हटले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/my-mamta-jhali-kali/