अकोट: शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील रहिवाश्यांच्या सुरक्षेसाठी मागणी
केलेल्या थोपण भिंतीचे काम अद्याप सुरू झाले नाही.
यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्य
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
प्रभाग क्रमांक 14 मधील महल्ले यांच्या घरापासून ते रहिवासी रघुनाथ रोकडे यांच्या घरापर्यंत थोपण
भिंत बांधण्याची मागणी नागरिकांनी पूर्वीच केली होती.
या कामासाठी निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात बांधकाम सुरू झालेले नाही.
त्यामुळे संतप्त नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात आज अकोट
नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि तत्काळ काम
सुरू न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ आणि उपाध्यक्ष
लखन इंगळे यांनी केले. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला संगीता सरदार यांच्यासह
अनेक महिलांनी आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला.
या ठिय्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली असून लवकरच
योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.