अकोला |
14 एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातील जुन्या बसस्थानकावर साकारण्यात
आलेल्या भव्य रांगोळीवरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्यरात्री
Related News
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
दानापूर येथे लईत यात्रा महोत्सव साजरा.
शाब्दिक वाद निर्माण झाला. सुमारे 18 हजार चौरस फूट जागेत रांगोळीतून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली होती,
मात्र या प्रतिमेजवळ काँग्रेसचे ‘पंजा’ चिन्ह देखील रेखाटल्याचे दिसून आले.
यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
रात्री उशिरा वंचितचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि हातात झाडू घेऊन ‘पंजा’ चिन्ह पुसून टाकलं.
यानंतर काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये तब्बल चार तास वाद झाला.
या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे म्हणाले,
“बाबासाहेबांना काँग्रेसने दोन वेळा पराभवाचा सामना करायला लावला.
त्यामुळे बाबासाहेबांच्या नावाचा आणि प्रतिमेचा राजकीय उपयोग होऊ देणार नाही.”
सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, घटनेने राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे.
प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/maharashthal-mahayati-sarkarmadhyaye-punha-vad-shinde-ani-ajitdada-program/