अकोला |
14 एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातील जुन्या बसस्थानकावर साकारण्यात
आलेल्या भव्य रांगोळीवरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्यरात्री
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
शाब्दिक वाद निर्माण झाला. सुमारे 18 हजार चौरस फूट जागेत रांगोळीतून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली होती,
मात्र या प्रतिमेजवळ काँग्रेसचे ‘पंजा’ चिन्ह देखील रेखाटल्याचे दिसून आले.
यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
रात्री उशिरा वंचितचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि हातात झाडू घेऊन ‘पंजा’ चिन्ह पुसून टाकलं.
यानंतर काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये तब्बल चार तास वाद झाला.
या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे म्हणाले,
“बाबासाहेबांना काँग्रेसने दोन वेळा पराभवाचा सामना करायला लावला.
त्यामुळे बाबासाहेबांच्या नावाचा आणि प्रतिमेचा राजकीय उपयोग होऊ देणार नाही.”
सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, घटनेने राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे.
प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/maharashthal-mahayati-sarkarmadhyaye-punha-vad-shinde-ani-ajitdada-program/