22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला भारताने
‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. या सैनिकी कारवाईत भारताने पाकिस्तान
आणि पाक अधिकृत काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
Related News
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
या धाडसी कारवाईनंतर देशभरात, तसेच राज्यात आनंदाचे आणि देशभक्तीने भारलेल्या वातावरणाची लाट उसळली आहे.
अकोल्यातही ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात असून, मोहम्मद अली चौकात मुस्लिम बांधवांनी फटाके फोडत,
मिठाई वाटून आणि घोषणा देत ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद व्यक्त केला.
नमाज अदा केल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि भारतीय सेनेचे अभिनंदन केले.
यावेळी “भारतीय सेना जिंदाबाद”, “आमचा देश, आमचा अभिमान” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
उपस्थितांनी सांगितले की, “देशहितासाठी जी कारवाई झाली आहे, ती योग्य आणि आवश्यक होती. दहशतवादाचा अंत होणे गरजेचे आहे.”
या घटनेने अकोल्यातील सामाजिक सलोखा आणि राष्ट्रनिष्ठा याचे एक सकारात्मक उदाहरण समोर आले आहे.
देशभक्ती ही केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून, ती सर्व भारतीयांची सामूहिक भावना आहे, हे या दृश्यातून स्पष्ट झाले.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-shiva-naikoon-sainikana-salaam-ladu-watoon-jallosh/