अकोल्यात मुस्लिम बांधवांकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा जल्लोष; फटाके फोडून मिठाई वाटली

अकोल्यात मुस्लिम बांधवांकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा जल्लोष; फटाके फोडून मिठाई वाटली

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला भारताने

‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. या सैनिकी कारवाईत भारताने पाकिस्तान

आणि पाक अधिकृत काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

Related News

या धाडसी कारवाईनंतर देशभरात, तसेच राज्यात आनंदाचे आणि देशभक्तीने भारलेल्या वातावरणाची लाट उसळली आहे.

अकोल्यातही ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात असून, मोहम्मद अली चौकात मुस्लिम बांधवांनी फटाके फोडत,

मिठाई वाटून आणि घोषणा देत ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद व्यक्त केला.

नमाज अदा केल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि भारतीय सेनेचे अभिनंदन केले.

यावेळी “भारतीय सेना जिंदाबाद”, “आमचा देश, आमचा अभिमान” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

उपस्थितांनी सांगितले की, “देशहितासाठी जी कारवाई झाली आहे, ती योग्य आणि आवश्यक होती. दहशतवादाचा अंत होणे गरजेचे आहे.”

या घटनेने अकोल्यातील सामाजिक सलोखा आणि राष्ट्रनिष्ठा याचे एक सकारात्मक उदाहरण समोर आले आहे.

देशभक्ती ही केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून, ती सर्व भारतीयांची सामूहिक भावना आहे, हे या दृश्यातून स्पष्ट झाले.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-shiva-naikoon-sainikana-salaam-ladu-watoon-jallosh/

Related News