अकोला ते दर्यापूर दरम्यानच्या राज्य महामार्ग
क्रमांक 312 वर काही दिवसांपूर्वीच नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.
रस्त्यालगत लहान बसस्थानकांची उभारणी देखील करण्यात आली.
Related News
मात्र, या बसस्थानकांचा वापर प्रवाशांऐवजी दारू
पिणाऱ्यांनी सुरू केला आहे.
काही तळीरामांनी बसस्थानकांवर दारू पिऊन तोडफोड केली
असून बैठकीच्या खुर्च्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
दारूच्या नशेत वाद होऊन अकोला जिल्ह्यात गेल्या
काही दिवसांत दोन ते तीन खून झाले आहेत.
अशा पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी “ऑपरेशन प्रहार”
अंतर्गत अवैध दारूविक्रीवर छापे टाकण्यास सुरुवात केली असली,
तरी महामार्गावर सुरू असलेल्या या अराजकतेवर
अद्याप नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.
बसस्थानकांची तोडफोड होऊन शासनाचे लाखो
रुपयांचे नुकसान झाले असून,
“अकोला हे ओपन बार झाले का?”
असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी
महामार्गावरील रात्रीच्या गस्तीत वाढ करून
अशा घटनांवर तातडीने अंकुश घालावा,
अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक
कार्यकर्त्यांकडून होत आहे.
