अकोला: शहरातील जेतवन नगरमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून तीन
युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या
करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात खदान
Related News
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;
IPL 2025 : प्लेऑफसाठी ‘करो या मरो’ सामना, मुंबई विरुद्ध दिल्ली…
ई-पासपोर्टची सुरुवात भारतात : प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार,
मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती
संभळ जामा मशिदीच्या सर्वे प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका;
भारतभरात पाकिस्तानसाठी काम करणारे गुप्तहेर उघड!
‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधिमंडळापासून ममता यांची तुटवड;
Jammu-Kashmir: शोपियांमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक:
उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर;
पोलिसांनी एकूण 8 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी 4 आरोपी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मृतकाच्या कुटुंबाची न्यायासाठी लढा – फाशीची मागणी
या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आज अकोला शहरातील खदान
परिसरातून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
मृतक करण शितळेच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली.
घटनेची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी जेतवन नगर येथे किरकोळ कारणावरून तणाव निर्माण झाला होता.
ऑटोचा किरकोळ धक्का लागल्याने वाद वाढला आणि त्याचे पर्यवसान चाकू हल्ल्यात झाले.
यात करण शितळे गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई
खदान पोलिसांनी तातडीने कारवाई करत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. मात्र,
मृतकाच्या कुटुंबीयांना फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरा पर्याय मान्य नसून,
त्यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.
नागरिकांमध्ये संताप – कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने कायदा
व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,
अशी मागणी मृतकाच्या कुटुंबीयांसह नागरिकांकडून केली जात आहे.