अकोला | प्रतिनिधी
अकोला शहरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून पिवळसर आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत
असल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. शहराच्या विविध भागांतून अशा पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांमध्ये नाराजी आहे.
Related News
निवासी वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा आरोप….
🇮🇳 पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट; पाकिस्तानात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत चर्चेला उधाण
मलेरियाचा धोका कायम! महाराष्ट्रात पुन्हा वाढले रुग्ण; लक्षणं, कारणं आणि खबरदारी जाणून घ्या
अतिरेक्यांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिला जीव
हृदयद्रावक घटना! ७ वर्षांनी झालेलं बाळ
कारवाईचे संकेत! भारत 7 दिवसांत पाकिस्तानवर मोठा वार करू शकतो….
उष्णतेचा चटका!
पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट
श्रीनगरमध्ये अडकलेल्या अकोल्याच्या सहा नागरिकांना परत
पहलगाम हल्ल्याचा मोठा परिणाम:
“आता बस्स! आतंकवाद संपवाच – मुर्तीजापुरातून संतप्त आवाज”
मरणातही जर सन्मान नसेल, तर जिवंतपणी न्यायाची अपेक्षा कशी करायची?”
अकोला शहराला महान येथील काटेपूर्णा जलप्रकल्पातून 90 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो.
पाण्याचे शुद्धीकरण रीतसर केले जाते, असा दावा संबंधित जलशुद्धीकरण विभागाने केला आहे.
मात्र, पाणी शुद्ध असूनही ते नागरिकांपर्यंत दूषित स्वरूपात पोहोचत असल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
-
पोटदुखी, त्वचेचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजारांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
-
अनेक भागांतून पाण्याचा वास आणि रंग बदलल्याची माहिती मिळत आहे.
-
शाळा, रुग्णालये आणि घरांमध्ये हे पाणी वापरण्याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे.
प्रशासनाचे स्पष्टीकरण अपुरे?
जलशुद्धीकरण विभागाचे अधिकारी म्हणतात, “पाणीप्रक्रिया पूर्णपणे शुद्ध पद्धतीने केली जाते.
कोणताही दोष आमच्या ट्रीटमेंटमध्ये नाही.” पण प्रश्न असा आहे की,
जर प्रकल्पात पाणी शुद्ध होत असेल, तर ते दूषित स्वरूपात नागरिकांपर्यंत का आणि कसे पोहोचते?
दोष पुरवठा व्यवस्थेत?
-
पाईपलाइनमधील गळती किंवा झाडलेल्या पाईप्समधून गाळ किंवा घाण मिसळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
या बाबींची तांत्रिक तपासणी करून दोष नेमका कोठे आहे हे प्रशासनाने शोधणे गरजेचे ठरत आहे.
जनतेची मागणी:
दूषित पाणीपुरवठ्याची सखोल चौकशी करून दोषी घटकांवर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित पाण्याचा पुरवठा तात्काळ सुरू करावा.