अकोला | प्रतिनिधी
अकोला शहरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून पिवळसर आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत
असल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. शहराच्या विविध भागांतून अशा पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांमध्ये नाराजी आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
अकोला शहराला महान येथील काटेपूर्णा जलप्रकल्पातून 90 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो.
पाण्याचे शुद्धीकरण रीतसर केले जाते, असा दावा संबंधित जलशुद्धीकरण विभागाने केला आहे.
मात्र, पाणी शुद्ध असूनही ते नागरिकांपर्यंत दूषित स्वरूपात पोहोचत असल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
-
पोटदुखी, त्वचेचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजारांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
-
अनेक भागांतून पाण्याचा वास आणि रंग बदलल्याची माहिती मिळत आहे.
-
शाळा, रुग्णालये आणि घरांमध्ये हे पाणी वापरण्याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे.
प्रशासनाचे स्पष्टीकरण अपुरे?
जलशुद्धीकरण विभागाचे अधिकारी म्हणतात, “पाणीप्रक्रिया पूर्णपणे शुद्ध पद्धतीने केली जाते.
कोणताही दोष आमच्या ट्रीटमेंटमध्ये नाही.” पण प्रश्न असा आहे की,
जर प्रकल्पात पाणी शुद्ध होत असेल, तर ते दूषित स्वरूपात नागरिकांपर्यंत का आणि कसे पोहोचते?
दोष पुरवठा व्यवस्थेत?
-
पाईपलाइनमधील गळती किंवा झाडलेल्या पाईप्समधून गाळ किंवा घाण मिसळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
या बाबींची तांत्रिक तपासणी करून दोष नेमका कोठे आहे हे प्रशासनाने शोधणे गरजेचे ठरत आहे.
जनतेची मागणी:
दूषित पाणीपुरवठ्याची सखोल चौकशी करून दोषी घटकांवर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित पाण्याचा पुरवठा तात्काळ सुरू करावा.