फडणवीस यांचा राष्ट्रीय अभ्यास कमी – संजय राऊत यांचा घणाघात
दिल्ली निवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“मुख्यमंत्री झालं म्हणजे शहाणा झालो असं नाही. काही भाग्य योग असतात आणि काही
फ्रॉड भाग्य योग असतात. हे सरकार फ्रॉड भाग्य योगाने आलेलं आहे,” अशी टीका त्यांनी केली.
Related News
तणावमुक्त जीवनासाठी झोपेचे महत्त्व; अपुरी झोप ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत तणाव (stress) हा प्रत्येकाच्...
Continue reading
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर Amruta Fadnavis यांचा गंभीर गौप्यस्फोट; कॉर्पोरेटमधील अनुभवांबाबत व्यक्त केल्या भावना
नाशिकमध्ये सुरू असलेल्या कथित कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावरून र...
Continue reading
‘Bigg Boss Marathi 6’ मध्ये मोठा ट्विस्ट! मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरेची धमाकेदार एंट्री
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो
Continue reading
१६ वर्षांनंतर न्यायाचा विजय: विपुल अमृतलाल शाह यांचा धनादेश अनादर प्रकरणात मोठा विजय
बॉलिवूडमधील नामांकित निर्माता-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह
Continue reading
आनंदाची बातमी! एलपीजीवरील अवलंबित्व कमी होणार? सरकारचा Ethanol कडे मोठा कल
भारतातील ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणारी एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या...
Continue reading
फडणवीस यांनी राहुल गांधींवर केलेल्या टिकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, “फडणवीस अजून राष्ट्रीय नेते नाहीत.
त्यांचा राष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास कमी आहे.
त्यांनी अभ्यास करावा. जोपर्यंत अमित शाह आहेत, तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल की नाही, याबाबत शंका आहे.”
दिल्लीतील निकाल आधीच ठरलेला होता, असा दावा करत राऊत यांनी सांगितले की,
“फडणवीस प्रचाराला गेले नसते तरी निकाल तोच आला असता.” तसेच, एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करत,
“शिंदे यांची मातोश्री दिल्लीत आहे, त्यांना तिथे रात्रीच जावं लागतं, कारण दिवसा कुणी भेटत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.