मोठी बातमी समोर येत आहे. आता बांगलादेशी आणि रोहिंग्या रडारवर असून,
केंद्रीय गुप्तचर खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोठी बातमी समोर येत आहे.
आता बांगलादेशी आणि रोहिंग्या रडारवर असून, केंद्रीय गुप्तचर खात्याकडून
Related News
प्रतिनिधी: रामेश्वर कावरे | उमरा, अकोट तालुका
अकोट तालुक्यातील उमरा गावाच्या सीमेवर असलेल्या ११ केव्ही कासोद फिडरवरील रोहित्राजवळ,
एका मेंढीपाळकावर भीषण प्रसंग ओढावला. दि. १२ एप्...
Continue reading
मुर्तीजापुर | अधर खान
शासनाच्या निद्रिस्त अवस्थेला धक्का देण्यासाठी, आणि शेतकरी व दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार
जनशक्ती पक्षाने ११ एप्रिलच्या रात्री मुर्तीजापुर येथे जोरदार मशा...
Continue reading
अकोला –
एका वयोवृद्ध व्यक्तीची बॅग बळजबरीने हिसकावून पळून गेलेल्या अनोळखी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात
अकोला पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आलं आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडवली ...
Continue reading
नवी दिल्ली –
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे भारतात सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले आहेत.
सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 93,390 रुपये, तर 2...
Continue reading
जळगाव –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना डंपरद्वारे ठार मारण्याची धमकी देणारा खळबळजनक ई-मेल मुख्यमंत्री
कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मेलमध्ये केवळ जिल्हाधिका...
Continue reading
अहमदाबाद –
शहरातील खोखरा परिसरात एका उंच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी इलेक्ट्रिक
कुकरमुळे अचानक आग लागली. या आगीत दाट धूर संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरला होता.
या दर...
Continue reading
मुंबई, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापले असून, आता स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि...
Continue reading
अकोला, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोला शहरात
तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक
...
Continue reading
अकोट, ता. १२ एप्रिल –
अकोट तालुका व शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती
आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बुद्धगया येथील महाबोधी ...
Continue reading
मुंबई: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात १६,००० पानी
आरोपपत्र दाखल केले असून, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
या आरोपपत्रात सैफच्या पत्नी करीन...
Continue reading
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारच्या
वतीने 14 व 15 एप्रिल 2025 रोजी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट' या विशेष
मोफत सहल...
Continue reading
किन्हीराजा (वार्ताहर) –
येथील श्री शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने श्रीकृष्ण
सोनुने यांनी शाळेला दीड लाख रुपये किंमतीचे आरोप्लॅन्ट भेट दि...
Continue reading
सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात बांगलादेशच्या जमात ए इस्लामी,
या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
या स्लीपर सेलचं नेटवर्क राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे केंद्रीय गुप्तचर खात्यासह, राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे.
तपास यंत्रणा सक्रिय झाली असून, युद्धपातळीवर रोहिंग्या आणि बांगलादेशींचा शोध सुरू आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जवळपास वीस जिल्ह्यांमध्ये बनावट
जन्म प्रमाणापत्र आणि दाखले वितरीत झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
राज्यात जवळपास दीड ते दोन लाख बांगलादेशी घुसखोर असू शकतात,असा तपास यंत्रणेचा अंदाज आहे.
या घुसखोरांना मदत करणारे स्थानिक आणि प्रशासनातील अधिकारी
देखील आता सरकारच्या रडारवर असणार आहेत. बांगलादेशातील सत्ता बदलानंतर पुन्हा
एकदा जमात ए इस्लामी संघटना कार्यरत झाली असून, या दहशतवादी संघटनेचा
भारताला मोठा धोका असल्याचं गुप्तचर विभागानं म्हटलं आहे.
दरम्यान बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात
येणाऱ्या घुसखोरांविरोधात त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह
मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
माजी खासदार राहुल शेवाळे यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेत, केंद्रीय गृहमंत्रालयाने
वरील निर्देश दिले आहेत. अभिनेता सैफ अली खानवर बांगलादेशी घुसखोरांकडून झालेल्या
हल्ल्याची घटना ताजी असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या आदेशाने घुसखोरांच्या
विरोधातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.
राहुल शेवाळे यांनी 28 नोव्हेंबर 2024 रोजी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या निवेदनात
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ( TISS ) या संस्थेकडून घुसखोरांविषयी
केलेल्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला होता. शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की,
TISS ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमारमधून आलेल्या
घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/grand-enlightening-buddha-bhim-geetancha-program-concluded-on-the-occasion-of-shaurya-diwas/