अकोला: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आणि परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या
कोठडीतील मृत्यूच्या निषेधार्थ अकोल्यात आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.
मोर्चात सहभागी लोकांनी काळ्या फिती लावून आणि काळे कपडे घालून निषेध व्यक्त केला. या दरम्यान,
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच मंत्री धनंजय मुंडे
यांचा राजीनामा घेण्याचे आणि फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचे आवाहन करण्यात आले.
मोर्चा अशोक वाटिका येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
आर्थिक मदतीची घोषणा:
आयोजकांकडून देशमुख कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली.
या घटनांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला.
या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून सरकारला
आणि प्रशासनाला कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/nitish-and-chakraborty-in-jurel-bishnoi-waiting-for-the-first-t20-suryacha-sens-11-will-be-a-rocky-corner/