माजी मंत्री आणि काही दिवसांपूर्वी अजित पवार गटात दाखल
झालेले बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या झाली. लॉरेन्स बिश्नोई
गँगने ही हत्या केल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत
Related News
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
हिवरखेड परिसरात वृक्षारोपण; पत्रकार संघटनेकडून पर्यावरण पूजन
३८ वर्ष आरोग्य सेवा दिल्यानंतर वृंदा विजयकर यांचा सेवानिवृत्त सत्कार सोहळा पार पडला
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरणातील काही आरोपींची
धरपकड केली आहे. त्यात संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोई गँगकडे
जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आज त्यांचा मुलगा
आणि आमदार झिशान सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल
झाला. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
वडीलांच्या हत्येनंतर त्याने मोठी मागणी केल्याचे समोर येत आहे.
थोड्या वेळापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान
सिद्दीकी हा सागर बंगल्यावर दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची तो भेट घेणार आहे. तर त्याचवेळी कुडाळ
विधानसभा मतदारसंघाच्या दाव्यासाठी राणे सुद्धा सागर बंगल्यावर
दाखल झाले आहेत. आताच्या वृत्तानुसार, अजितदादा पवार, प्रफुल्ल
पटेल हे पण फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे या
सर्वच प्रकरणासह वेगवान राजकीय घडामोड घडताना दिसत आहे.
झिशान सिद्दीकी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीत, बाबा
सिद्दीकी यांच्या हत्येसंबंधीच्या तपासाची इत्यंभूत माहिती देण्यात
आल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची धागेदोर कुठंपर्यंत आहेत,
याविषयी उहापोह झाल्याचे समजते. दरम्यान झिशान यांनी याप्रकरणात
न्याय देण्याची विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. सलमान खानचे
जवळचे मित्र असल्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा बिश्नोई
गँगशी संबंधित काही जणांनी समाज माध्यमांवर केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pavarans-trasala-koodhun-bjp-sodatoy-maji-ministers-announcement/