सोयाबीनला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड

जामनी

जामनी: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठी

कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथे धान्याची व

सोयाबीनची काही मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. पण

Related News

इतर धान्याची विशेष आवक नाहीत, हे मात्र तितकेच खरे. शेतकरी

ही सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत

पण, चांगला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार

आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच

मेटाकुटीला आला आहे, शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उत्पादनातून

शिल्लक राहिलेले काही धान्य, कडधान्य साठवून ठेवले होते. पण

निसर्गाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या

लागवड खर्चासाठी घरी साठवून ठेवलेले उत्पादन मिळेल त्या भावात

विकावे लागले. यामुळे आता दिवाळी सण तोंडावर आला असताना

बाजार समितीत धान्याची आवक दिसून येत नाही. आता शेतकऱ्यांना

नव्या सोयाबीनवरच अवलंबून राहावे लागत आहे. यंदा ऑक्टोबर महिना

अर्धा उलटून गेला तरी वरुणराजा शांत व्हायचे नाव घेत नसल्याने सोयाबीन

उत्पादकांना सोयाबीनचे उत्पादन घरी आणण्यासाठी तारेवरची कसरत

करावी लागत आहे. हल्ली जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन सवंगणीला

आले आहेत. तर ज्यांचे सोयाबीन मळणीला आले आहे त्यांना वरुणराजा

सतावत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/teesri-aghadi-150-jaga-ladhanar/

Related News