मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्यावर टीका करताना भाजपला मोठा इशारा दिला.
“वेळ पडली तर मराठे त्यांच्या भाजपचा एन्काउंटर करणार”, असं
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. “अजून काही ठरले
नाही. इच्छुक वाढले आहेत. चर्चा केली. आपल्याला 95 टक्के
समाजकरण आणि 5 टक्के राजकारण करायचे आहे.
उमेदवारबद्दल चर्चा झाली. आपला बाप ( समाज ) 20 तारखेला
येणार आहे, आणि तो बाप निर्णय घेणार आहे. शेती, आरक्षण,
दलित मुस्लिम, गोरगरीब ओबीसींच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मी
सर्वांचे मते जाणून घेतली. उद्या कोणीही बोलु नये की, आम्हाला
मते मांडू दिली नाहीत. आजपर्यंत 1800 उमेदवारी अर्ज आले
आहेत, आणि आज पुन्हा काही अर्ज आले आहेत”, असं मनोज
जरांगे यांनी सांगितलं. ही लाट देवेंद्र फडणीस यांचा कार्यक्रम
लावणार आहे. या मनस्थितीमध्ये फडणवीस यांनी जायला भाग
पाडले. जो समाज त्यांच्या बाजूने होता त्यांची मुडदे फडवणीस
यांनी पाडली. देशातील सर्वात डागी माणूस, आणि देशात पहिला
आहे. न्यायाची अपेक्षा फडवणीस यांच्याकडून होती, पण त्यांनी
विष आमच्या नारड्यात ओतले. फडवणीस यांनी जाताना खुन्नस
दिली आणि मला मराठ्यांशी काही देणेघेणे नाही हे दाखवले.
धनगर आरक्षणचा निर्णय फडवणीस यांनी घेतला आणि त्यांनी रद्द
केला. वेळ पडली तर मराठे त्यांच्या भाजपचा एन्काउंटर करणार”,
असा घणाघात मनोज जरांगे यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/congress-candidates-ravindra-chavan-for-nanded-lok-sabha-elections/