महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले
आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत
राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २०
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार
आहे. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा
निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा
निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून
मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे
महाविकासआघाडीच्या जागावाटपाची शेवटच्या बैठकीला सुरुवात
झाली आहे. त्यामुळे आजच महाविकासआघाडीचा फॉर्म्युला
फिक्स होणार असल्याचे बोललं जात आहे. यंदाची विधानसभा
निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून
जागावाटपाचे सूत्र आखले जात आहे. त्यातच आता
महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आजच ठरणार
असल्याचे बोललं जात आहे. सध्या महाविकासआघाडीची मुंबईत
एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील सोफीटेल
हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या बैठकीत जागावाटपावर
शिक्कामोर्तब केले जाणार आहे. महाविकासआघाडीतील
जागावाटपात विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून पेच आहेत.
महाविकास आघाडीत काँग्रेस ११९, शिवसेना ठाकरे गट ८६ आणि
शरद पवारांची राष्ट्रवादी ७५ जागा, शेकाप ३, समाजवादी पक्ष २
आणि माकप २ जागा अशापद्धतीने जागावाटप होणार आहे.
महाविकासाघाडीचे आतापर्यंत २२२ जागांवर एकमत झालं आहे.
त्यात मुंबईतल्या १३ जागा ठाकरे गटाला, ८ जागा काँग्रेस, १
समाजवादी पार्टीला देण्याबाबत सहमती झाली आहे. तर
मुंबईतल्या ४ जागांवर तिन्ही पक्षांकडून रस्सीखेच आहे. त्यात
संभाव्य जागांमध्ये उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता
आहे. भाजपाविरोधात एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे यावर
तिन्ही पक्षांचं एकमत आहे. अनेक मुस्लीम बहुल जागांवर काँग्रेस
आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/team-indias-lowest-run-score-in-the-country/