महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले
आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत
राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २०
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार
आहे. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा
निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा
निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून
मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे
महाविकासआघाडीच्या जागावाटपाची शेवटच्या बैठकीला सुरुवात
झाली आहे. त्यामुळे आजच महाविकासआघाडीचा फॉर्म्युला
फिक्स होणार असल्याचे बोललं जात आहे. यंदाची विधानसभा
निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून
जागावाटपाचे सूत्र आखले जात आहे. त्यातच आता
महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आजच ठरणार
असल्याचे बोललं जात आहे. सध्या महाविकासआघाडीची मुंबईत
एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील सोफीटेल
हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या बैठकीत जागावाटपावर
शिक्कामोर्तब केले जाणार आहे. महाविकासआघाडीतील
जागावाटपात विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून पेच आहेत.
महाविकास आघाडीत काँग्रेस ११९, शिवसेना ठाकरे गट ८६ आणि
शरद पवारांची राष्ट्रवादी ७५ जागा, शेकाप ३, समाजवादी पक्ष २
आणि माकप २ जागा अशापद्धतीने जागावाटप होणार आहे.
महाविकासाघाडीचे आतापर्यंत २२२ जागांवर एकमत झालं आहे.
त्यात मुंबईतल्या १३ जागा ठाकरे गटाला, ८ जागा काँग्रेस, १
समाजवादी पार्टीला देण्याबाबत सहमती झाली आहे. तर
मुंबईतल्या ४ जागांवर तिन्ही पक्षांकडून रस्सीखेच आहे. त्यात
संभाव्य जागांमध्ये उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता
आहे. भाजपाविरोधात एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे यावर
तिन्ही पक्षांचं एकमत आहे. अनेक मुस्लीम बहुल जागांवर काँग्रेस
आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/team-indias-lowest-run-score-in-the-country/