अमरावती शहरातून अतिशय धक्कादायक बातम्या समोर येत
आहेत. अमरावती शहरात दररोज हत्येच्या घटना समोर येत आहेत
. अमरावतीत गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 7 हत्येच्या घटना
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
समोर आल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक
राहिलेला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित
घटनांनंतर आता राजकारणही तापत आहे. पण या राजकारणानंतर
गुन्हेगारांना जबर बसेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमरावती शहरात हत्येचे सत्र सुरूच आहे. अमरावतीच्या चित्रा
चौकात रात्री तरुणाची हत्या करण्यात आली. चाकूने पोटात
सपासप वार करून शुल्लक वादातून ही हत्या करण्यात आली
आहे. गोलू सुनील उसरेटे (वय 30 वर्ष) असं मृतक तरुणाचे नाव
आहे. गोलू हा अमरावतीच्या रतनगंज येथील रहिवासी होता. विकी
गुप्ता याने शुल्लक कारणावरून गोलूच्या पोटात चाकूने वार करून
ही हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपी
विक्की गुप्ता याचा शोध सुरू केला आहे. घटनेनंतर तणाव निर्माण
झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री 12.30 वाजता
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हत्यांच्या घटनांनी अमरावती शहर हादरले आहे. मागच्या 10
दिवसात 7 जणांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. अमरावती
शहरातील पोलिसांची दहशत संपली आहे का? अशी परिस्थिती
निर्माण झाली आहे. आमदार रवी राणा यांनी पोलिसांच्या
कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, काल रात्री
गोलू उसरेटे या युवकाची हत्या झाल्यानंतर नातेवाईक आक्रमक
झाले. हत्या करणाऱ्या आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह
स्वीकारणार नाही, अशी भूमिका गोलूच्या समर्थक आणि
नातेवाईकांनी घेतली. आक्रमक नागरिकांनी बडनेराचे आमदार रवी
राणा यांच्या घराला घेराव घातला. यानंतर अमरावती शहरातील
तडीपार गुंडांना पोलिसांनी अटक केली नाही तर आपण आंदोलन
करणार, असा इशारा रवी राणा यांनी दिला. पोलिसांनी 5
वाजेपर्यंत आरोपींना अटक करावी. नाहीतर मी स्वतः पोलीस
ठाण्यात येऊन आंदोलन करणार, असं रवी राणा म्हणाले.