बाबूपेठ उड्डाणपुलाची बाबूपेठवासीयांची मागील अनेक वर्षांची
मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण
करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे, तरी महापालिकेने
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन लोकार्पण करण्यात यावे,
अशी मागणी माजी नगरसेवक स्नेहल देवआनंद रामटेके यांच्यासह
बाबूपेठवासीयांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील
नागरिक रेल्वेच्या उड्डाणपुलाअभावी मोठा त्रास सहन करीत होते.
रेल्वे फाटक बंद असल्याने प्रत्येक गंभीर रुग्णांना आपला जीव
गमवावा लागला होता. अखेर या पुलाला मंजुरी मिळाली रेल्वे
विभाग, महाराष्ट्र शासन आणि मनपा प्रशासन यांच्या माध्यमातून
या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. या पुलाचे बांधकाम सुरू
असतानाच चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत
तत्कालीन नगरसेवक स्नेहल रामटेके, अनिल रामटेके यांनी या
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी
केली होती. संपूर्ण सभागृहाने ही मागणी एकमताने मंजूर केली
होती. आता या पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पुलाचे
लोकार्पण करण्यासंदर्भात प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लोकार्पण सोहळा
आयोजित केला जाईल, अशी नागरिकांत चर्चा आहे. मनपाने
सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार या उड्डाणपुलाला डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्यानंतर लोकार्पण सोहळा
घ्यावा, अशी मागणी स्नेहल रामटेके यांनी केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/demand-to-give-bharat-ratna-to-nitish-kumar/