भारतातील कारागृहात जातीवर आधारित भेदभाव होत असल्याबाबत
खंत व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक असा निर्णय
दिला. कैद्यांच्या जातीवर आधारित भेदभाव कारागृहात करण्यात येऊ
Related News
नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होण...
Continue reading
नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगा...
Continue reading
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
अकोला |
अकोल्यात रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता आरटीओ विभागाने मोठे पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यात "रोड सेफ्टी व्हिजन व्हॅन" कार्यान्वित करण्यात आली असून ती आधुनिक तंत्रज्ञानाने स...
Continue reading
नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. भारतातील सर्व राज्य आणि
केंद्रशासित प्रदेशांनी तीन महिन्यांमध्ये कारागृह नियमावलीत सुधारणा
करावी, असेही निर्दे श देण्यात आले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून
७५ वर्ष झाली, तरीही आपण जातीभेदाचे निर्मूलन करू शकलो नाहीत,
याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. पत्रकार सुकन्या शांता यांनी
दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्या. जेबी पारडीवाला
आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सरन्यायाधीश
डीवाय चंद्रचूड सदर सुनावणीदरम्यान म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात
जातीवर आधारित भेदभावासारखी दृष्ट प्रथा आपण संपवू शकलेलो नाहीत.
देशातील सर्व नागरिकांना न्याय आणि समानता प्राप्त करून देईल, असे
राष्ट्रीय ध्येय आपल्याला डोळ्यासमोर ठेवावे लागेल. संविधान सभेत केलेल्या
शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या भविष्याबाबत
ज्या चिंता व्यक्त केल्या होत्या, त्या आजही खऱ्या ठरत आहते, असेही सर्वोच्च
न्यायालयाने यावेळी म्हटले. याचिकाकर्त्या सुकन्या शांता म्हणाल्या की, उत्तर
प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल यांच्यासह ११ राज्यातील कारागृहात
कैद्यांना त्यांच्या जातीवर आधारित काम दिले जाते. त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही
जातीनुसार ठरते. अनेक राज्यातील कारागृह नियमावलीत जातीवर आधारित
भेदभावाचा उल्लेख आहे. जेवण बनविण्याचे काम उच्च जातीमधील कैद्यांना
दिले जाते. स्वच्छतेचे काम खालच्या जातीमधील कैद्यांना दिले जाते.
कारागृहात कैद्याच्या जातीचा उल्लेख कशाला?
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण
विषय याचिकेच्या माध्यमातून पुढे आणल्याबद्दल याचिकाकर्त्यांचे आभार व्यक्त
केले. खंडपीठाने म्हटले की, संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिला आहे.
अनुच्छेद १७ मध्ये अस्पृश्यतेवर बंदी घालण्यात आली आहे. तर अनुच्छेद २१
नुसार सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. सर्व कारागृहात
याचे पालन झाले पाहीजे. कारागृहात कैद्यांच्या जातीवरून त्यांना विशिष्ट काम
देणे किंवा त्यांची राहण्याची वेगळी व्यवस्था करणे, असे भेद राहता कामा नयेत.
Read also: https://ajinkyabharat.com/marathi-language-status-as-elite-language/