मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागात दाणादाण उडवली.
गेल्या तीन दिवसांपासून काही भागात कोसळधार सुरू आहे. या
परतीच्या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
दिसून आले आहे. उभी पीकं आडवी झाली आहेत. तर काही
पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या आस्मानी
संकटामुळे शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला
आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
नांदेड जिल्ह्यात सततच्या पाऊसामुळे पपई पिकांवर रोगांचा
प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान होत आहे.
मुदखेड तालुक्यातील पपईच्या बागांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सलग गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने पपई
पिकावर रोंगाचा प्रादुर्भाव झाल्याने पपईची उगवन क्षमता कमी
झाली. पपई पिकत नसल्याने पपई बागेचं प्रचंड नुकसान झालं
आहे. शेकडो एकरवरील पपईच्या बांगा संकटात आल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून विजेच्या कडकडाटासह आणि
वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्याचा फटका पपई पिकाला
बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील भातसा नगरमध्ये
काल रात्री मुसळधार पावसामुळे शेतीची मोठे नुकसान झाले आहे.
त्यामूळे हात तोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठे नुसकान झाले
आहे. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार
हजेरी लावली. पारतीच्या पावसाचे जिल्ह्यात जोरदार हजेरी
लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या हलक्या स्वरूपाच्या
धान पिकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/tremendous-trailer-of-yek-number-released/