मणिपूरमधील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं
आहे. केंद्र सरकारने मणिपूरमध्ये जावं. राजकारण बाजूला ठेऊन
देशाच्या हिताचं काम केलं पाहिजे. तिथल्या महिलांना आणि नागरिकांना
Related News
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
न्याय मिळावा अशी मागणी आम्ही पंतप्रधानांना अनेकवेळा केली आहे,
असं म्हणत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर
निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात देखील गुन्हेगारी वाढली असं केंद्र
सरकारकडूनच सांगण्यात येत आहे. राज्यातील सरकार अपयशी ठरलं आहे.
काल बारामतीत घटना घडली ती दुर्दैवी आहे. अशा घटना होऊ नये असं
माझं मत आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. भाजपकडून इतिहास बदलण्याचा
प्रयत्न आहे. भाजपचे लोक चुकीचा इतिहास मांडत आहे. मात्र आम्ही त्यांना मांडू
देणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवारांवर जनतेने प्रेम आणि
विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला पाहिजे. त्याची ही पोहोचपावती
आहे. दिल्लीत शरद पवार यांच्याकडे एक हक्काचा माणूस म्हणून बघितलं जातं,
पण जरी वेगळा पक्ष असला तरी आणखी एक आपला हक्काचा माणूस आहे,
ते म्हणजे नितीन गडकरी. तसेच बारामतीचा जागा कुठला पक्ष लढवणार हे अजून
निश्चित झालेलं नाहीय. गणेशोत्सवानंतर यावर चर्चा होईल. कोण-किती जागा लढवणार,
यावर निर्णय झाला आहे, अशी माहिती देखील सुप्रिया सुळेंनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/stop-land-acquisition-of-bhaktipeeth-and-industrial-highways/