केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशात १२ औद्योगिक स्मार्ट शहरे बनवणार

 पंतप्रधान

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑगस्ट रोजी

मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत देशातील

विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने

Related News

देशातील १२ औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिली. या निर्णयानुसार,

९ राज्यांमध्ये १२ स्मार्ट औद्योगिक शहरे तयार करण्यात येणार आहेत.

या माध्यमातून तब्बल १० लाख तरुणांना रोजगार मिळणार असल्याचं

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट

प्रोग्राम (NICDP) अंतर्गत या १२ स्मार्ट औद्योगिक शहरे तयार करण्यात

येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं

सांगितलं जात आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार तब्बल २८,६०२ कोटी

रुपयांची गुंतवणूक करणार असून देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी

हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितली आहे.

देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने सरकारने एक महत्त्वाचे

पाऊल उचलले असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने

देशातील १२ औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिली. यामध्ये उत्तराखंडमधील खुरपिया,

महाराष्ट्रातील दिघी, केरळमघील पलक्कड, पंजाबमधील राजपुरा-पटियाळा,

उत्तर प्रदेशमधील आग्रा आणि प्रयागराज, बिहारमधील गया, तेलंगणामधील झहीराबाद,

आंध्र प्रदेशमधील ओरवाकल व कोपर्थी, राजस्थानमधील जोधपूर व पाली या

शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/possibility-of-disruption-of-banking-services-to-bank-employees/

Related News