नागपूर : महावितरणकडून ‘शून्य विद्युत अपघात’ हे ध्येय गाठण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला असून, नागपूर परिमंडलातील सर्व कार्यालयांमध्ये कामाची सुरुवात ‘विद्युत सुरक्षा शपथे’ने करण्याचा निर्णय अंमलात आणण्यात आला आहे. सोमवारी (दि. २ मार्च) या उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
काटोल रोडवरील ‘विद्युत भवन’ मुख्यालयात मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, संजय वाकडे, कार्यकारी अभियंते महेश चतुर्वेदी व अजित जिचकार यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमात केवळ मुख्य कार्यालयच नव्हे, तर मानेवाडा, तुळशीबाग, कॉंग्रेसनगर, हिंगणा, बुटीबोरी, गांधीबाग, त्रिमूर्तीनगर, शंकरनगर, वर्धमान नगर, काटोल, कळमेश्वर, खापरखेडा, वाडी आणि सिव्हिल लाईन्ससह सर्व उपविभागीय व शाखा कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महावितरणने सुरक्षिततेला केवळ नियमांपुरते मर्यादित न ठेवता ती कामकाजाचा अविभाज्य भाग बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे दर सोमवारी किंवा आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांच्या दिवसाची सुरुवात सुरक्षा शपथेने होणार आहे. या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करून अपघातांची संख्या कमी करणे.
Related News
नोकरीसाठी पोर्तुगालला गेली, तिथे जाताच विकून टाकलं; नागपूरच्या महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
स्मार्ट मीटरविरोधात गडचिरोलीत हल्लाबोल; महावितरण कार्यालयावर हजारोंचा मोर्चा
11 गावांवर एका लाईनमनचा भार! 48 तास वीज ठप्प; कर्मचारी टंचाईमुळे शेतकरी संतप्त
रामरक्षा आंदोलनापूर्वी मोठी राजकीय घडामोड! बावनकुळे थेट फडणवीसांच्या भेटीला
सोनम वांगचूक प्रकरणावरून संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल; ‘रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच कारवाई’
Nagpur Crime: 3 मित्रांचा ड्रग्ज पार्टीचा धक्कादायक प्लॅन फसला; नामांकित हॉटेलवर पोलिसांची धाड, एमडीसह रंगेहात अटक
अजब चोरी ! विजेच्या खांबांवरील ॲल्युमिनियमच्या तारा लंपास; लाखो रुपयांचे नुकसान
थरारक ऑपरेशन! 4 महिन्यांपासून दहशत माजवणारी वाघीण अखेर जेरबंद; पिंजऱ्यात बसून महिला डॉक्टरांनी साधला अचूक डार्ट, पाहा 7 खास फोटो
मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले की, महावितरणकडून सर्व आवश्यक सुरक्षा साधने आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जात असले तरी, सुमारे ९५ टक्के अपघात मानवी चुकीमुळे घडतात. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने अधिक दक्षता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. ‘सुरक्षा ही केवळ नियमावली नसून प्रत्येकाची जबाबदारी आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्यापूर्वी वैयक्तिक सुरक्षा उपकरणे व साधनांची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘विद्युत सुरक्षा पद्धत’ आणि ‘सुरक्षा दीप’ ही पुस्तके सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, जेणेकरून सुरक्षित कामकाजाची सवय दृढ होईल.
प्रत्येक जीव मौल्यवान असल्याची जाणीव ठेवत, विद्युत वाहिन्यांवर काम करताना पूर्ण खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. महावितरणच्या या उपक्रमामुळे सुरक्षिततेची संस्कृती अधिक बळकट होऊन ‘शून्य अपघात’ या उद्दिष्टाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/expansion-of-tumbbad-universe-nawazuddin-siddiqui-strong-entry-in-tumbbad-2/
