देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) वर कर्जाचे ओझे वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या 80,952 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पानंतरही विविध पायाभूत प्रकल्पांमुळे पालिकेची एकूण देणी तब्बल 2.44 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहेत.
सागरी किनारा मार्गाचा उपनगरीय टप्पा, जलबोगदे, गोरेगाव–मुलुंड जोडरस्ता, रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच पुलांच्या उभारणी व दुरुस्ती यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे हा आर्थिक बोजा वाढला आहे. आगामी आर्थिक वर्षात या प्रकल्पांसाठी सुमारे 41 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, जानेवारी 2026 अखेर पालिकेकडे सुमारे 81 हजार कोटी रुपयांच्या मुदतठेवी आहेत. मात्र प्रकल्पांवरील देणी या रकमेच्या जवळपास तिप्पट असल्याने आर्थिक ताण अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत प्रकल्प खर्च सातत्याने वाढत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 2023-24 मध्ये 1.90 लाख कोटी असलेली देणी 2024-25 मध्ये 2.32 लाख कोटींवर गेली आणि आता 2.44 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
Related News
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप; 169 नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह!
तुकाराम मुंढेंची ‘हवा’! रवीना टंडनला रेस्टॉरंटमध्ये आला भन्नाट अनुभव; म्हणाली, ‘आता भीतीच संपली!’
ममता बॅनर्जींना पुन्हा मोठा धक्का? मेघालयात 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा!
भारताच्या सीमेवर पाकिस्तानचा मोठा युद्धसराव; ‘KARRAR’चा व्हिडीओ समोर, चिंता वाढली!
9 पेक्षा जास्त SIM कार्ड असतील तर होणार बंद? जाणून घ्या सरकारचा नवा नियम
सोनम वांगचुक यांचे अभिजीत दिपकेंबाबत मोठे विधान; म्हणाले, “तो काही संत नाही!”
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर CM फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘संविधानिक मागण्या असतील तर मार्ग काढू’
“देवेंद्र फडणवीसांचे 100 टक्के दिवस भरले”; मनोज जरांगेंच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं
कारच्या इंजिनापासून टॉयलेटपर्यंत… पावसाळ्यात साप इथेच का लपतात? जाणून घ्या कारणं!
“शिंदे येतात तरी कशाला गद्दार लोकांचे मेळावे घेण्यासाठी?”; अंबादास दानवेंची घणाघाती टीका
‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; PM नरेंद्र मोदींचा तरुणांना मोठा संदेश
शिंदेंचा परभणीतील कार्यक्रम होणारच! जरांगेंचा संजय जाधवांना थेट इशारा
यंदाच्या अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठी 48,164 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र पालिकेचे उत्पन्न अपेक्षित वेगाने वाढत नसल्याने खर्च भागवण्यासाठी मुदतठेवी आणि राखीव निधीचा वापर केला जात आहे. याशिवाय चालू वर्षात 13,765 कोटी रुपयांचे अंतर्गत कर्ज घेण्याचीही योजना आखण्यात आली आहे.
एकूणच, शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणाऱ्या पायाभूत प्रकल्पांमुळे मुंबई महानगरपालिकेवर आर्थिक ताण वाढत असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. भविष्यात उत्पन्नवाढीचे ठोस उपाय न केल्यास आर्थिक संतुलन राखणे हे पालिकेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
