देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) वर कर्जाचे ओझे वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या 80,952 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पानंतरही विविध पायाभूत प्रकल्पांमुळे पालिकेची एकूण देणी तब्बल 2.44 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहेत.
सागरी किनारा मार्गाचा उपनगरीय टप्पा, जलबोगदे, गोरेगाव–मुलुंड जोडरस्ता, रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच पुलांच्या उभारणी व दुरुस्ती यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे हा आर्थिक बोजा वाढला आहे. आगामी आर्थिक वर्षात या प्रकल्पांसाठी सुमारे 41 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, जानेवारी 2026 अखेर पालिकेकडे सुमारे 81 हजार कोटी रुपयांच्या मुदतठेवी आहेत. मात्र प्रकल्पांवरील देणी या रकमेच्या जवळपास तिप्पट असल्याने आर्थिक ताण अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत प्रकल्प खर्च सातत्याने वाढत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 2023-24 मध्ये 1.90 लाख कोटी असलेली देणी 2024-25 मध्ये 2.32 लाख कोटींवर गेली आणि आता 2.44 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
Related News
IMD Weather Update : धोकादायक इशारा! पुढील 24 तासांत 5 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा
Ajit Pawar Plane Crash: धक्कादायक खुलासा! DGCA चा स्फोटक अहवाल, मोठ्या त्रुटी उघड
टावरी पाडा परिसरात भीषण पाणीटंचाई; महिला आणि ज्येष्ठ नागरिक रांगा लावताना
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगाव दौऱ्यावर; संत गजानन महाराजांचे दर्शन घेणार
संत गाडगे महाराज यांना महावितरणकडून अभिवादन
Maharashtra Liquor Policy 2026: मोठा धक्कादायक निर्णय! 3 सणांवर मद्यविक्रीला परवानगी
रोहित पवार भावूक : अजित पवार यांच्या शोक प्रस्तावावर सभागृहात डोळे भरले
शरद पवार यांची तब्येत पुन्हा बिघडली – पुण्यात रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल
बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर वाद, मनोज जरांगे पाटीलांचे जोरदार आरोप
5 महत्त्वाचे अपडेट्स: Goregaon-Mulund Link Road प्रकल्पाची प्रगती आणि पहिला टप्पा 2026 मध्ये सुरू होणार
Solapur News : “अविश्वसनीय धैर्य!” वडिलांच्या निधनाच्या दु:खावर मात करत विद्यार्थिनीने दिली SSC परीक्षा
IMD Weather Update : धोकादायक इशारा! 9 जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अलर्ट, वादळी वाऱ्यासह संकट
यंदाच्या अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठी 48,164 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र पालिकेचे उत्पन्न अपेक्षित वेगाने वाढत नसल्याने खर्च भागवण्यासाठी मुदतठेवी आणि राखीव निधीचा वापर केला जात आहे. याशिवाय चालू वर्षात 13,765 कोटी रुपयांचे अंतर्गत कर्ज घेण्याचीही योजना आखण्यात आली आहे.
एकूणच, शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणाऱ्या पायाभूत प्रकल्पांमुळे मुंबई महानगरपालिकेवर आर्थिक ताण वाढत असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. भविष्यात उत्पन्नवाढीचे ठोस उपाय न केल्यास आर्थिक संतुलन राखणे हे पालिकेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
