वीज बिलाच्या वसूलीवरच महावितरणचे अस्तित्व अवलंबून आहे. अकोला परिमंडळात एकूण २८० कोटी रूपयांची थकबाकी असून, त्यातील फक्त ८५ कोटी रूपये वसूल झाले आहेत. त्यामुळे वीज थकबाकी शुन्य करण्यासाठी महावितरणने सामुहिक वसूली मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.
मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके आणि कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावक यांच्या पुढाकाराने मेहकर विभागातील शेलगावात कारवाई करण्यात आली. यावेळी थकबाकीदार ३८ वीज ग्राहकांचे मीटर काढले गेले. या ग्राहकांचा वीज पुरवठा फक्त संपूर्ण थकबाकी, सुरक्षा ठेव व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच जोडला जाईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली.
“मिशन ९० दिवस” अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचे चालू बिल आणि जानेवारी पर्यंतची थकबाकी वसूल करणे महावितरणचे उद्दिष्ट आहे. यासाठी मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी प्रत्येक कर्मचारी वसूलीसाठी बाहेर काढण्याचे निर्देश दिले असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला वीज बिल वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे.
Related News
महावितरणने स्पष्ट केले की, वीज बिल भरले नाही तर पुरवठा थांबवला जाईल. सामुहिक मोहीमेच्या वेळी विरोध करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचेही सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अकोला परिमंडळातील २८० कोटी रूपयांच्या थकबाकीत घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक आणि इतर वर्गातील ग्राहकांचा समावेश आहे. जिल्ह्यांनुसार थकबाकी अशी आहे: अकोला जिल्हा – ११५ कोटी ७४ लाख, बुलडाणा – १४४ कोटी, वाशिम – ५१ कोटी ६५ लाख. यापैकी अनुक्रमे ४० कोटी, ३२ कोटी आणि १३ कोटी रूपये वसूल करण्यात आले आहेत.
महावितरणची ही कारवाई वीज थकबाकी शून्य करण्यासाठी निर्णायक पाऊल असून, ग्राहकांना वेळेत बिल भरण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे.
read also : https://ajinkyabharat.com/greetings-from-mahavitaran-to-saint-gadge-maharaj/
