गावामध्ये १०० टक्के सौर ऊर्जीकरण
सौर उर्जेच्या वापरासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न होत असताना
महाराष्ट्रातील साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
हे राज्यातील पहिले सौरग्राम झाले आहे. गावामध्ये ‘महावितरण’च्या वतीने
१०० टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे.
राज्यातील पहिले ‘सौर ग्राम’ झालेल्या मान्याचीवाडीचे लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वीजक्षेत्रात राज्य शासनाने केलेल्या
कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
तसेच पहिल्या सौरग्रामचे सरपंच रवींद्र माने यांचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस,
पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र,
मान्याचीवाडीचे सरपंच रवींद्र माने आणि महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे
उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील
मान्याचीवाडी गावाने राज्यात पहिले सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे.
या गावातील प्रत्येक नागरिकाचे मी अभिनंदन करतो.
सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे
घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य होत आहे. तसेच राज्य शासनाने मागेल
त्यांना सौर कृषिपंप योजना जाहीर केली असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना
१० टक्के रक्कम तर अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून
साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषिपंप व सौर पॅनेल्स मिळणार आहे.
उर्वरित रक्कम राज्य शासन अनुदानातून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री
शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून
पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी
योजना व मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/gautami-patilla-land-approved/