सुकळी (ता. पातूर) – पातूर तालुक्यातील सुकळी ते सायवनी हा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सायवनीमार्गे मुख्य मळसूर रस्त्याकडे जाणारा हा मार्ग विशेषतः श्री क्षेत्र सोपिनाथ महाराज संस्थान, मळसूर येथे यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यावश्यक मानला जातो. मात्र रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि उखडलेली डांबरीकरणाची पातळी यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती किंवा डागडुजी करण्यात आलेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. परिणामी चार ते पाच किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे विस्कळीत झाला असून वाहनचालकांना मोठा फेरा मारत सुकळी फाटा मार्गे जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक निवेदने सादर केली होती. मात्र त्या निवेदनांवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. यात्रेचा कालावधी जवळ येत असताना रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Related News
अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “अप्रिय घटना होईल असे ठोस कारण नाही”
Continue reading
पेट्रोल-डिझेलसाठी परावलंबित्व संपणार? 2030 पर्यंत 50% गरज शेतकरी, तर 50% EV मधून पूर्ण होईल; पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजपच्या कार्यका...
Continue reading
प्रशांत किशोर यांनी विजयाचा प्लॅन दिला, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केली तीच चूक; रणनीतीवरून पक्षात मतभेद?
Prashant Kishor NCP News...
Continue reading
घटस्फोटानंतर जॉइंट होम लोनचा EMI कोण भरणार? घर खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम
Joint Home Loan Rules : लग्नानंतर अनेक जोडप...
Continue reading
मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली; शुगर रिपोर्टवरच जरांगेंनी उपस्थित केली शंका, म्हणाले – “पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा”
मराठा आरक्षणाच्...
Continue reading
टेन्शन… टेन्शन… टेन्शन! भारतालाही नेपाळसारख्या जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये
नेपाळ-तिबेट सीमेवरील जलप्रलयानंतर हिमालयीन पट्ट्यातील कॅस्केडिंग डिझास्टरचा धोका चर्चेत...
Continue reading
सोन्याच्या दरात मोठी घसरण होणार? आयात शुल्क कमी करण्याच्या हालचाली; सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या दरा...
Continue reading
आरक्षणाचा प्रश्न आणखी पेटणार? भटक्या-विमुक्त समाजही रस्त्यावर उतरणार; मंत्री संजय राठोड यांचा इशारा
महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एक...
Continue reading
अमित ठाकरे आक्रमक; छत्रपती शिवरायांच्या शेजारी असलेला मोदींचा फोटो हटवला, पुण्यात राजकीय चर्चेला उधाण
पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या पाहणी दौऱ्यावर असताना
Continue reading
महाराष्ट्रातील 2 कोटी, दिल्लीत 47 लाख मतदारांची नावे SIR ड्राफ्टमधून गायब; तुमचं नाव आहे का? असं करा चेक
महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये विशेष सखोल मतदार पुनरीक्षण अर्थात
Continue reading
प्रताप सरनाईक यांच्यावर नरेंद्र मेहतांचा गंभीर आरोप; 39 कोटींचं टेंडर 160 कोटींवर कसं पोहोचलं?
मिरा-भाईंदरच्या राजकारणात सध्या मंत्री प्रताप सरनाई...
Continue reading
स्थानिक नागरिकांच्या मते, हा रस्ता सुकळीवरून चान्नीला जाण्यासाठी सर्वात सोयीचा आहे. परंतु सध्या खड्डेमय परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला असून रात्रीच्या वेळी प्रवास करणे अधिकच कठीण झाले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन सुकळी ते सायवनी रस्त्याचे काम पूर्णत्वास न्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रस्त्याच्या कामाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत असली तरी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रस्ता रोकोचा इशारा
“रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा वाहनधारक सचिन जाधव (सुकळी) यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
read also: https://ajinkyabharat.com/chinese-robot-dog-controversy-ai-summit-madhuun-galgotias-university-la-bahercha-rasta-10-shocking-revelations/