सुकळी (ता. पातूर) – पातूर तालुक्यातील सुकळी ते सायवनी हा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सायवनीमार्गे मुख्य मळसूर रस्त्याकडे जाणारा हा मार्ग विशेषतः श्री क्षेत्र सोपिनाथ महाराज संस्थान, मळसूर येथे यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यावश्यक मानला जातो. मात्र रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि उखडलेली डांबरीकरणाची पातळी यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती किंवा डागडुजी करण्यात आलेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. परिणामी चार ते पाच किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे विस्कळीत झाला असून वाहनचालकांना मोठा फेरा मारत सुकळी फाटा मार्गे जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक निवेदने सादर केली होती. मात्र त्या निवेदनांवर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. यात्रेचा कालावधी जवळ येत असताना रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Related News
लाखपुरीत धक्कादायक घटना! दोन दुचाक्या जळून खाक; लाखोंचे नुकसान, दोषींवर कारवाईची मागणी
मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी गावात रविवारी दुपारच्या सुमारास...
Continue reading
लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात, महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप
मुंबई : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाका...
Continue reading
धक्कादायक! 3 जूनला ठाण्यात 12 तास पाणीपुरवठा बंद; मुंब्रा, कळवासह अनेक भागांना मोठा फटकाठाणे : मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे ठा...
Continue reading
बीडमध्ये धनंजय देशमुख यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. फिर्यादीत रवीराज साबळे यांचाही उल्लेख. नेमकं काय घडलं? वाचा...
Continue reading
चेंबूरमध्ये मेट्रो आणि मोनोरेलचा संगम; इंटरचेंज सुविधेमुळे मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सोयीस्करमुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आण...
Continue reading
PM Surya Ghar Yojana : 40 लाख कुटुंबांचा मोठा लाभ; 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळवण्याची सुवर्णसंधीमुंबई : देशभरात वाढत्या वीज दरांमुळे ...
Continue reading
धक्कादायक! 25 वर्षीय रिलस्टार रोहिणी पाराध्येची आत्महत्या; पती निलेशची हृदयद्रावक पोस्ट वाचून नेटकरी भावूकसोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालु...
Continue reading
आज आकाशात दुर्मिळ ‘ब्ल्यू मून’ आणि ‘मायक्रोमून’चा खगोलीय संगम; आकाशप्रेमींसाठी ऐतिहासिक रात्र
आजची रात्र खगोलप्रेमी आणि आकाश निरीक्षकांसाठी अत्यंत ...
Continue reading
पुण्यात विषारी दारूकांडाचा थरार: २२ जणांचा बळी, ‘ सिकंदर ’ नावामागील भयावह सत्य उघड
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या भीषण विषारी दारूकांडाने...
Continue reading
मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! 248 कोटींच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार जूनमध्ये खुला; 30 मिनिटांचा प्रवास होणार अवघ्या 5 मिनिटांतमुंबई :...
Continue reading
पुणे विषारी दारूकांड; 19 कुटुंबांचा आधार हरपला, सरकारकडून 5 लाखांची आर्थिक मदत, नोकरीचेही आश्वासनपुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून...
Continue reading
अंकुर वाढवे Attack : पुसदमध्ये 40 जणांनी घेरलं; अभिनेत्याने सांगितली थरारक घटना
40 जणांच्या टोळीकडून हल्ल्याचा प्रयत्न; 'चला हवा येऊ द्या' फेम अंक...
Continue reading
स्थानिक नागरिकांच्या मते, हा रस्ता सुकळीवरून चान्नीला जाण्यासाठी सर्वात सोयीचा आहे. परंतु सध्या खड्डेमय परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला असून रात्रीच्या वेळी प्रवास करणे अधिकच कठीण झाले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन सुकळी ते सायवनी रस्त्याचे काम पूर्णत्वास न्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रस्त्याच्या कामाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत असली तरी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रस्ता रोकोचा इशारा
“रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा वाहनधारक सचिन जाधव (सुकळी) यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
read also: https://ajinkyabharat.com/chinese-robot-dog-controversy-ai-summit-madhuun-galgotias-university-la-bahercha-rasta-10-shocking-revelations/