मागच्या काही काळात भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते.
पण आता हळूहळ हे संबंध पूर्ववत होत आहेत. मालदीव सरकारने
एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनसाठी हा निर्णय म्हणजे झटका आहे.
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
मालदीवने त्यांच्या 28 बेटांची व्यवस्था भारताकडे सोपवण्याचा निर्णय
घेतला आहे. या 28 बेटांवर पाणी पुरवठा आणि सीवरशी संबंधित योजनांची
कामं आणि देखभालीची जबाबदारी भारताची असेल.
मालदीवचे राष्ट्रपीत मोहम्मद मुइज्जू यांनी स्वत: ही घोषणा केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. “मालदीवच्या 28 बेटांवर
पाणी पुरवठा योजनांची जबाबदारी एस जयशंकर यांच्याकडे सोपवताना आनंद झाला.
नेहमीच मालदीवची मदत केल्याबद्दल भारत सरकार आणि खासकरुन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो” असं मुइज्जू यांनी
त्यांच्याा सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मालदीव आणि भारतामध्ये झालेला हा करार भारत विरोधकांना चांगलाच झोंबणारा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.
मालदीव छोटासा देश असला तरी हिंद महासागर क्षेत्रातील एक प्रमुख देश आहे.
शेजाऱ्यांना प्रथम प्राधान्य हे भारताच धोरण आहे. मालदीव भारताचा
मोठा व्यापारी भागीदार आहे. त्याशिवाय मालदीवमधील पर्यटनात भारताचा मोठा वाटा आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मालदीव दौऱ्यावर चीनच खूप बारीक लक्ष होतं.
चीनला मालदीव बरोबर खूप खास संबंधांची, सहकार्याची अपेक्षा नाहीय
असं ग्लोबल टाइम्समधील लेखात म्हटलं आहे. यातून चीनचा जळफळाट स्पष्ट दिसून येतो.
भारताचे मालदीव बरोबर संबंध बिघडवण्यात चीन अपयशी ठरला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ramdas-athawale-is-the-true-heir-of-babasaheb-ambedkar-and-sanjay-raut/