अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली? सुनील तटकरे यांचा जोरदार पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. “अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये असतानाच विलिनीकरणाची घाई कोणी केली, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही,” असं ठणकावून सांगत तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केलं की, ही भेट शपथविधीनंतरची औपचारिक आणि सौजन्यपूर्ण भेट होती.
Related News
बारामतीत 19 वर्षीय तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून घेत जीवन संपवले; प्रेमसंबंधातून तणाव असल्याची चर्चा
बारामती : बारामती शहर परिसरात एका 19 वर्षीय तरुण...
Continue reading
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Continue reading
अमेरिकेची दादागिरी संपणार? भारतासाठी मोठी गुड न्यूज; BRICS परिषदेदरम्यान इराणची मोठी घोषणा
भारतात सुरू असलेल्या BRICS शिखर परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय प...
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; आंदोलन थांबणार नाही, मुंबईकडे मराठे कूच करणार
उपोषणाचा १६वा दिवस; जवळच्या सहकाऱ्याला त्रास दिल्याचा जरांगेंचा आरोप, मुसळधार पाऊस असला तरी मुंब...
Continue reading
रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकले; 500 ड्रोन हल्ल्यांनी युक्रेन हादरले, 9 जणांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले असून, युक्रेनव...
Continue reading
परंड्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी तालुकाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काँग्रेसच्या ...
Continue reading
मुंबईतील मराठा मोर्चापूर्वी संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; ‘सरकारला जी भाषा कळते ती वापरा’
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील १९ सप्...
Continue reading
सीमा वादात चीनची चालाखी; भारतात येऊनही आडमुठेपणा, मोदी-जिनपिंग बैठकीनंतर दोन्ही देशांच्या भूमिकेत मोठा फरक
भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्...
Continue reading
गणेशोत्सवासाठी रेल्वे-मेट्रोची मोठी तयारी; 386 विशेष गाड्या, मुंबईत मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा
Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सवाच्या ...
Continue reading
मोठी अपडेट! अखेर ठरलं, ठाकरे की शिंदे? शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा?
महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळावा हा केवळ एक राजकीय कार्यक्रम न...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विकले; कोट्यवधींची किंमत, नूतनीकरणानंतर पुन्हा चर्चेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य...
Continue reading
तटकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधताना संवेदना व्यक्त केल्या. “मोदींनी त्यांना ग्वाही दिली की केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे. पक्ष, संघटना आणि राज्याच्या व्यापक हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असा संदेश त्यांनी दिला,” असं तटकरे यांनी सांगितलं. तसेच, “केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सवाल उपस्थित केला. “दुःखद प्रसंगात, अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली होती? त्या काळात घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी कोणाची होती?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाचं ठोस उत्तर अद्याप समोर आलेलं नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून, आगामी काळात या मुद्द्यावरून आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/deputy-chief-minister-sunetra-pawars-visit-to-delhi-detailed-discussion-with-prime-minister-modi-and-amit-shah/