पाणीपुरवठा, रस्ते आणि विकासाच्या कामांवर बोलणाऱ्या आलेगाव ग्रामपंचायतीत सध्या भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका निलंबित ग्रामसेवकाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून जनसुविधा निधीतून २,१९,००० रुपये गळवण्यात आल्याचा खुलासा झाला आहे.
विशेष म्हणजे, हा व्यवहार त्या काळातच झाला जेव्हा संबंधित ग्रामसेवक पदावरही नव्हते! यामुळे पातूर तालुक्यातील ही ग्रामपंचायत आता भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे का? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
नेमका काय घडलं?
आलेगावच्या तत्कालीन ग्रामसेवकांना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांनी ३ डिसेंबर २०२५ रोजी आपला कार्यभार श्री. गणेश जाधव यांच्याकडे सोपवला. त्यावेळी खात्यात ८,०२,१५४ रुपये शिल्लक होती.
पण २२ डिसेंबर २०२५ रोजी—ग्रामसेवक घर बसलेले असतानाच—त्यांच्या बनावट सह्या करून दोन धनादेश (चेक क्र. ००२१ व ००२०) तयार करण्यात आले.
Related News
आर्णी पत्रकार संघाची नवी दमदार कार्यकारिणी गठीत; आबिद फानन अध्यक्ष, जाकीर सोलंकी सचिव
आर्णी : पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासोबतच सामाजिक आणि जनहिताच्या वि...
Continue reading
पुसद | तालुका प्रतिनिधी – कुलदिप सुरोशे
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबं...
Continue reading
तुकाराम मुंढेंचा ‘दणका’! Domino’s नंतर Parle Agro गोदामावर 11 तास धाड; Frutiy, Appy Fizzसह ₹1 लाखांहून अधिक माल जप्त
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयएएस अधिकारी
Continue reading
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी
IPS रूपा मौदगिल : महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प...
Continue reading
नाशिक : नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसंदर्भात प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू अ...
Continue reading
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
नांदेड : पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री
Continue reading
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! राष्ट्रीय कार्यकारिणीवरून कपिल सिब्बलांचा शिंदे गटाला सवाल
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कुणाची, पक्षावरील नियंत्रण क...
Continue reading
मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर; पतीच्या मृत्यूच्या धक्क्यानंतर पत्नीनेही घेतलं टोकाचं पाऊल
1 महिन्यात गायकवाड कुटुंबावर दुहेरी आघात; पतीनंतर पत्नीनेही...
Continue reading
चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत मैदानात; 16 ऑगस्टला महत्त्वाची बैठक
चाकण : चाकण औद्योगिक परिसरातील उद्योजकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी आता राज्...
Continue reading
रायगडचा पालकमंत्री मीच भरतशेठांचा ठाम दावा; महायुतीतील तिढा सुटण्याचे संकेत
अकोला/मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारला आगामी काही महिन्यांत दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. मात्र, रा...
Continue reading
अकोला पासपोर्ट कार्यालयात अतिरिक्त काउंटर, कर्मचाऱ्यांची मागणी
अकोला, दि. १२ ऑगस्ट २०२६ : अकोला आणि विदर्भातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकोला येथील पासपोर्ट कार...
Continue reading
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत आणि ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विद्यार्थी ...
Continue reading
ही रक्कम पंकज गजानन घोगरे या खाजगी व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यात आली.
प्रशासनाचे ‘मौन’ प्रश्नचिन्ह
चेकबुक सरपंचांच्या ताब्यात असताना हा व्यवहार कसा झाला?
बँकेने स्वाक्षऱ्यांची खातरजमा का केली नाही?
बँकेचे अधिकारी या कारभारात सामील होते का?
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, निलंबित व्यक्तीच्या नावाने व्यवहार होणे हे फक्त तांत्रिक चूक नाही, तर जाणीवपूर्वक केलेला फौजदारी गुन्हा आहे.
ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया
ग्रामस्थांचा संयम सुटला आहे “वरिष्ठांकडे तक्रार केली तरी काही होत नाही, उलट भ्रष्टाचाराचे नवीन ‘गिऱ्हाईक’ मिळतात.”त्यांचा आरोप आहे की विकासकामे केवळ कागदावर नाचवली जात आहेत.सीईओ आणि कलेक्टर स्तरावर तक्रारी जाऊनही कारवाई होत नाही.कारवाई न होणे हेच भ्रष्टाचाराचे मूळ कारण असून वरिष्ठ अधिकारीही ‘फिक्सिंग’ मध्ये असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
पुढील पाऊल
संबंधित निलंबित ग्रामसेवकाने आता थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बीडिओ यांच्याकडे तक्रार केली आहे.
ग्रामस्थांनी चेतावणी दिली आहे की, दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही, तर ते रस्त्यावर उतरून निषेध करणार आहेत.
“शासनाचा निधी हा जनतेच्या घामाचा पैसा आहे, तो अशा प्रकारे लुबाडणाऱ्यांना जेलमध्ये दाखवणं आवश्यक आहे!” — आलेगावच्या सामान्य नागरिकांची मागणी.
माजी ग्रामसेवक जयस तायडे यांची प्रतिक्रिया
“ग्रामपंचायत आलेगावच्या जनसुविधा फंड खात्यातून माझ्या संमतीशिवाय २,१९,००० रुपये काढले गेले. मी खाते बदललेले नाही आणि या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही. दोषींवर तातडीने कारवाई व्हावी.”
read also : https://ajinkyabharat.com/from-a-five-kilometer-cycle-trip-to-a-five-thousand-kilometer-international-trip-sumedh-motinagres-inspirational-story/