माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी
सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
मेटाने भारतातील व्हॉट्सअॅप सेवा बंद करण्यासंदर्भात
Related News
सरकारला कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही,
असे वैष्णव यांनी म्हटले आहे.
ते काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नावर बोलत होते.
यूजर्सचा तपशील सामायिक करण्यासंदर्भात सरकारची सूचनां मान्य न केल्यामुळे
भारतात आपली सेवा बंद करण्याचा विचार करत आहे का?
असा प्रश्न काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी केला होता.
तत्पूर्वी, या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च
न्यायालयाला सांगितले होते की,
जर कंपनीला मेसेजचे एन्क्रिप्शन तोडण्यास भाग पाडले गेले,
तर आपण भारतात काम करणे बंद करू.
मेटाने थेट भारतातील नव्या आयटी नियमांना आव्हान दिले होते.
तसेच, हे निय गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचेही
मेटाने म्हटले होते. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की,
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संबंधित सरकारचे निर्देश
राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी
जारी करण्यात आले आहेत. हे नियम भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षितता
आणि इतर देशांसोबत मैत्री कायम ठेवण्यासाठी करण्यात आले आहेत.
याशिवाय, सार्वजनिक सुव्यवस्थेशिवाय गुन्हेगारीला उत्तेजन देणारी कोणतीही कृती रोखण्यासाठी आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/manu-bhakar-ready-to-do-double-blast-in-olympics/
