पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका
राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
या योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
दोन दिवसापूर्वी वित्त विभागातूनही या योजनेला विरोध असल्याची चर्चा सुरू आहेत.
आता आमदार बच्चू कडू यांनीच राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.
” लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या,
यासाठी पैसे नसतील तर राज्यपाल यांच्या बंगल्याची जागा विका,
असा सल्लाही आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. दुधाला भाव द्या,
कामगाराला मजुरी द्या. चालकांसाठी चांगली योजना असली पाहिजे,
यासाठी पैसे नसतील मी त्यांना चांगला पर्याय देतो. त्यांनी राज्यपाल यांचा
४० एकरातील बंगला विकावा. त्याचे एक लाख कोटी रुपयांपर्यंत पैसे येतील.
ते पैसे तिकडे वापरा. राज्यपाल यांना ४० एकर जागा कशाला हवी?
त्यांना नवीन तीन, चार मजली इमारत बांधून द्या, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.
योजना कष्टकऱ्यांसाठी पाहिजेत
योजना आणायला काही हरकत नाही, पण त्या योजना कोणासाठी आणाव्यात हे महत्वाचं आहे.
योजना कष्टकऱ्यांसाठी असायला पाहिजेत, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.
देशात श्रीमंतच अधिक श्रीमंत होत चालला आहे.
मुंबईत पारसींकडे महत्वाची ६ हजार एकर जमीन आहे.
इंग्रजांकडून त्यांनी बक्षिस म्हणून मिळवली. कष्ट करणाऱ्यांना वन बीएचके घर
भेटणे खूप मोठं झालं आहे. कष्ट करणाऱ्यांचे मूल्य जपलं पाहिजे.
सरकारला आम्ही शेतकऱ्यांचा वाटा बजेटमध्ये किती आहे हे विचारत आहे.
त्यांचा या बजेटमध्ये वाटाच दिसत नाही, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.
सध्या मोठी विषमता सुरू आहे. ही विषमता तोडली पाहिजे.
यासाठी आम्ही ९ ऑगस्टला संभाजीनगरला मोठ्या मोर्चाचे आयोजन करत आहोत,
असंही आमदार कडू म्हणाले. “आम्ही विधानसभेसाठी संघटन करत आहोत,
आता आमचे दोन ते तीन सदस्य आहेत. आता आम्ही २० ते २५ जागांसाठी तयारी करत आहोत.
आतापर्यंत आम्हाला अनेकांचे अर्ज आले आहेत, असंही बच्चू कडू म्हणाले.
काँग्रेसनेही ज्या योजना आणल्या त्याच योजना आता महायुती सुद्धा आणत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/vice-presidents-anger-over-delhi-coaching-center-accident/