महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापू लागला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून
सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थेट निवडणुकीत उतरण्याचा इशारा दिला आहे.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे सातत्याने
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आक्रमक टीका करताना दिसत आहेत.
फडणवीसांकडूनही त्यावर स्पष्ट भूमिका मांडली जात आहे.
मात्र, मराठा आरक्षणावरून या दोघांमध्ये चालू असणाऱ्या वादावर
आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.
तसेच, या भांडणामागे ओबीसींना फसवण्याचा हेतू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळावा,
या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
मात्र, राज्यातील ओबीसी नेते व ओबीसी समाजाकडून याला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं जावं की नाही?
याबाबत सर्वच पक्षांकडून चर्चेचं आवाहन केलं जात असताना
प्रकाश आंबेडकरांनी केलेला दावा चर्चेचा विषय ठरला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/manu-bhakerane-bronze-medal-zincoon-rachala-history/