जामठी बु.:स्थानिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मुर्तींची
प्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास दिडशे वर्ष झालीत.
तेंव्हापासून आषाढी उत्सव आणि दहीहंडीची परंपरा जामठी बु. या गावात चालु आहे.
Related News
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
एकादशीनिमित्त सकाळी दरवर्षीप्रमाणेच तिर्थकलश स्थापन करण्यात आला.
या प्रसंगी पुजारी वासुदेव गावंडे, ह भ प गजानन उमाळे,
सौ. उमाळे, पुरुषोत्तम महाराज बोळे, साहेबराव बोळे,
शंकर दाते, डिगांबर चतुरकर, गंगाबाई वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर दिवसभर विविध भजनीमंडळांचे भजनांचे कार्यक्रम झालेत.
ह भ प रमेशराव श्रीराव यांचे तर्फे दर्शनार्थींना दिवसभर चहा व फराळ देण्यात आला.
दुपारी 3 ते 4 ह भ प पुरुषोत्तम महाराज बोळे यांचे प्रवचन झाले.
सायंकाळी सहा ते आठ हरिपाठाचा कार्यक्रम झाला.
रात्री 10 ते 12 भजनाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 22 ला दुपारी 4 वा. गावातून ‘श्री ‘च्या पालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गोपाळपुरीवर पुजा, आरती करून दहीहंडी फोडण्यात आली.
पुन्हा मंदिरात जागेवर मिरवणूक आल्यानंतर आरती करुन दहहंडी फोडण्यात आली.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 23 ला ह भ प वासुदेव गावंडे यांचे मार्गदर्शनात प्रक्षाळ पुजा करण्यात येऊन समारोप करण्यात आला.
Read also: https://ajinkyabharat.com/lives-of-passengers-saved-due-to-alertness-of-bus-driver/