एमआयएमसोबत घरोबा ! CM फडणवीसांचा पारा चढला; म्हणाले, “हे चालणार नाही, १०० टक्के कारवाई होईल”

एमआयएमc

अकोल्यातील अकोट आणि ठाण्यातील अंबरनाथ येथे सत्तेसाठी भाजपने काँग्रेस व एमआयएमसोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कट्टर विरोधकांसोबत स्थानिक पातळीवर युती केल्याने भाजपवर तीव्र टीका होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

एबीपीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“भाजपची काँग्रेस किंवा एमआयएमसोबत युती कधीच होऊ शकत नाही. हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. पक्षाच्या विचारधारेविरोधात जाणाऱ्यांवर १०० टक्के कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

अकोटमध्ये ‘अकोट विकास मंच’ आणि एमआयएमचा सहभाग
अकोट नगरपालिकेत स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला. मात्र, या मंचामध्ये ओवेसींच्या एमआयएम पक्षाचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Related News

अंबरनाथमध्ये थेट काँग्रेसशी हातमिळवणी
दुसरीकडे, अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट काँग्रेससोबत युती केली. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपने सत्तेसाठी विचारधारा बाजूला ठेवल्याची टीका विरोधकांकडून जोर धरत आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कठोर भूमिकेमुळे आता संबंधित स्थानिक नेत्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/priya-bapat-competes-with-shweta-tiwari-see-7/

Related News