शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे अजूनही चिंता
पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा काळ उलटला असला,
तरी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
अनेक भागात पेरण्या रखडल्या असून, जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात अकोल्यात विखुरलेल्या स्वरूपात का होईना,
पेरणीयोग्य पाऊस झाल्याने ८० टक्क्यांच्या वर पेरण्या आटोपल्या असल्या,
तरी काही तालुक्यांमध्ये मात्र समाधानकारक परिस्थिती नाही.
अनेक तालुक्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत.
जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
याशिवाय मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते.
कपाशी पिकाच्या लागवडीसाठी दमदार पावसाची गरज भासते;
मात्र जुलै महिन्याच्या ८ व ९ तारखेला कोसळलेल्या पावसानंतर पावसाने ब्रेक घेतला असून,
पावसाअभावी रोवणीची कामे रखडली आहेत.
जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस नसल्याने चिंतेचे ढग कायम आहेत.
पाऊस लांबल्याने मूग, उडीद या कडधान्याची लागवड स्थिरावली आहे.
१५ जुलैपर्यंत कडधान्यांची पेरणी करता येईल. त्यानंतर मूग,
उडीद आणि भुईमुगाची पेरणी करू नये, अशी कृषी विभागाची शिफारस आहे.
त्यामुळे मूग, उडदाचे क्षेत्र कमालीचे घटण्याची शक्यता आहे.
सोयाबीन, कापूस पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला आहे.
या पिकांच्या वाढीसाठी पुरेशा पावसाची गरज आहे.
पेरणी झालेली पिके पावसाअभावी उलटण्याचा धोका आहे.
अनेक ठिकाणी पेरण्या जगविण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यामधून
सिंचन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mg-shows-glimpse-of-cyber-u200bu200bconcept/