शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे अजूनही चिंता
पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा काळ उलटला असला,
तरी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही.
Related News
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अनेक भागात पेरण्या रखडल्या असून, जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात अकोल्यात विखुरलेल्या स्वरूपात का होईना,
पेरणीयोग्य पाऊस झाल्याने ८० टक्क्यांच्या वर पेरण्या आटोपल्या असल्या,
तरी काही तालुक्यांमध्ये मात्र समाधानकारक परिस्थिती नाही.
अनेक तालुक्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत.
जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
याशिवाय मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते.
कपाशी पिकाच्या लागवडीसाठी दमदार पावसाची गरज भासते;
मात्र जुलै महिन्याच्या ८ व ९ तारखेला कोसळलेल्या पावसानंतर पावसाने ब्रेक घेतला असून,
पावसाअभावी रोवणीची कामे रखडली आहेत.
जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस नसल्याने चिंतेचे ढग कायम आहेत.
पाऊस लांबल्याने मूग, उडीद या कडधान्याची लागवड स्थिरावली आहे.
१५ जुलैपर्यंत कडधान्यांची पेरणी करता येईल. त्यानंतर मूग,
उडीद आणि भुईमुगाची पेरणी करू नये, अशी कृषी विभागाची शिफारस आहे.
त्यामुळे मूग, उडदाचे क्षेत्र कमालीचे घटण्याची शक्यता आहे.
सोयाबीन, कापूस पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला आहे.
या पिकांच्या वाढीसाठी पुरेशा पावसाची गरज आहे.
पेरणी झालेली पिके पावसाअभावी उलटण्याचा धोका आहे.
अनेक ठिकाणी पेरण्या जगविण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यामधून
सिंचन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mg-shows-glimpse-of-cyber-u200bu200bconcept/