Doctorच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स घेताय? मग हे वाचाच, नाहीतर मोठा धोका ओढवू शकतो
खोकला, सर्दी, ताप, अंगदुखी किंवा घसा खवखवला की अनेक जण Doctorकडे जाण्याऐवजी थेट मेडिकल स्टोअरमधून गोळ्या आणतात. “मागच्या वेळी याने बरं वाटलं होतं” किंवा “सगळेच हे औषध घेतात” या समजुतीतून अँटीबायोटिक्सचा सर्रास वापर केला जात आहे. मात्र, ही सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत असल्याचा इशारा तज्ञ वारंवार देत आहेत. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’ कार्यक्रमात अँटीबायोटिक्सच्या चुकीच्या वापरावर चिंता व्यक्त केली होती.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या अहवालानुसार, विनाकारण अँटीबायोटिक्स घेण्यामुळे देशात अँटीबायोटिक रेझिस्टन्स (AMR) झपाट्याने वाढत आहे. ही समस्या इतकी गंभीर होत आहे की भविष्यात साध्या संसर्गावरही औषधांचा परिणाम होणार नाही, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.
अँटीबायोटिक्स म्हणजे नेमकं काय?

Related News
अँटीबायोटिक्स ही औषधे फक्त जिवाणूंमुळे (बॅक्टेरिया) होणाऱ्या आजारांवर परिणाम करतात. न्यूमोनिया, टायफॉइड, मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI), टीबी यांसारख्या आजारांमध्ये Doctor योग्य तपासणीनंतर अँटीबायोटिक्स देतात. मात्र, सर्दी, फ्लू, व्हायरल ताप, खोकला, घसा दुखणे हे बहुतेक वेळा व्हायरल आजार असतात. या आजारांमध्ये अँटीबायोटिक्स अजिबात उपयोगी ठरत नाहीत.
मग लोक अँटीबायोटिक्स का घेतात?
![]()
आरोग्य तज्ञांच्या मते, समाजात अँटीबायोटिक्सबाबत पुरेशी माहिती आणि जागरूकतेचा अभाव ही अत्यंत गंभीर बाब ठरत आहे. आजही अनेक लोकांना अँटीबायोटिक्स नेमकी कशासाठी असतात, त्यांचा योग्य वापर कसा करायचा आणि चुकीचा वापर केल्यास काय परिणाम होऊ शकतात, याची स्पष्ट कल्पना नसते. याच अज्ञानाचा फायदा घेत काही मेडिकल स्टोअरमध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायही अँटीबायोटिक्स सहज दिली जातात. त्यामुळे लोक स्वतःहून औषधे घेण्याची सवय लावून घेत आहेत. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारख्या सामान्य तक्रारींमध्येही अँटीबायोटिक्स घेतली जातात, जे अत्यंत चुकीचे आहे. तज्ञ सांगतात की अशा आजारांपैकी बहुतांश आजार व्हायरल असतात आणि त्यामध्ये अँटीबायोटिक्सचा काहीही उपयोग होत नाही. तरीही लोक लगेच गोळ्या घेऊन आजार बरा होईल, असा गैरसमज करून घेतात.
यापेक्षा अधिक धोकादायक बाब म्हणजे अनेकजण अँटीबायोटिक्सचा पूर्ण डोस घेत नाहीत. दोन-तीन दिवसांत बरे वाटू लागले की औषधे थांबवली जातात. काही वेळा उरलेली औषधे पुढच्या वेळी पुन्हा वापरली जातात किंवा इतरांना दिली जातात. Doctor या सवयीमुळे शरीरातील जिवाणूंना त्या औषधांची सवय लागते आणि ते औषधांवर प्रतिकार निर्माण करतात. परिणामी, भविष्यात गंभीर संसर्ग झाला तरी साधी अँटीबायोटिक्स प्रभावी ठरत नाही. अशा परिस्थितीत उपचार अधिक गुंतागुंतीचे, खर्चिक आणि कधी कधी जीवघेणेही ठरू शकतात.
आरोग्य तज्ञ स्पष्टपणे सांगतात की अँटीबायोटिक्स ही सामान्य वेदनाशामक औषधे नसून ती Doctorच्या सल्ल्यानेच घ्यावी लागतात. योग्य डोस, योग्य कालावधी आणि योग्य आजारासाठीच त्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा स्वतःच्या नकळत आपण आपल्या आरोग्यालाच धोका निर्माण करत आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आज काळाची गरज आहे.
अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे काय?

जेव्हा अँटीबायोटिक्सचा चुकीचा किंवा अति वापर होतो, तेव्हा शरीरातील जिवाणू त्या औषधांशी जुळवून घेतात. हळूहळू ती औषधे त्यांच्यावर परिणाम करत नाहीत. यालाच अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणतात. अशा वेळी संसर्ग वाढतो, उपचार कठीण होतात आणि काही वेळा परिस्थिती जीवघेणीही ठरू शकते.
तज्ञ सांगतात की आज अनेक सामान्य अँटीबायोटिक्स निष्प्रभ होत चालल्या आहेत. लघवीचा संसर्ग, न्यूमोनिया किंवा साध्या जखमेचा संसर्गही बरा होण्यासाठी जास्त काळ लागतो. काही रुग्णांना महागडी आणि तीव्र औषधे घ्यावी लागतात.
WHO चा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने अँटीबायोटिक रेझिस्टन्सला “मूक महामारी” असे संबोधले आहे. ही महामारी हळूहळू पसरत असून, वेळेवर उपाययोजना न केल्यास भविष्यात सामान्य आजारांवरही प्रभावी औषधे उपलब्ध राहणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.
सामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
आरोग्य तज्ञांच्या मते, अँटीबायोटिक्सबाबत काही मूलभूत नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे.
Doctorच्या सल्ल्याशिवाय कधीही अँटीबायोटिक्स घेऊ नयेत
Doctorनी दिलेला डोस पूर्ण करावा
अर्धवट औषधे थांबवू नयेत
उरलेली औषधे पुन्हा वापरू नयेत
सर्दी, फ्लू, व्हायरल तापामध्ये अँटीबायोटिक्स घेण्याचे टाळावे
सरकार आणि समाजाची जबाबदारी
तज्ञांच्या मते, ही समस्या केवळ व्यक्तीपुरती मर्यादित नाही. सरकार, आरोग्य यंत्रणा, मेडिकल स्टोअर्स आणि समाज या सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटीबायोटिक्स विक्रीवर कठोर नियंत्रण आणि जनजागृती मोहिमा राबवणे ही काळाची गरज आहे.
अँटीबायोटिक्स ही जीवन वाचवणारी औषधे आहेत, मात्र त्यांचा चुकीचा वापर भविष्यातील पिढ्यांसाठी मोठा धोका ठरू शकतो. आज जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने वागलो, तरच उद्या आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहील. त्यामुळे पुढच्या वेळी सर्दी किंवा ताप आला, तर स्वतःहून गोळी घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, हाच खरा सुरक्षित मार्ग आहे.
read also:https://ajinkyabharat.com/new-year-half-apple-fans-big-push-from-iphone-17/
